एकात्मिक शेती पद्धतीचे व्यवस्थापन : कोरडवाहू शेती
एकात्मिक शेती पद्धतीचे व्यवस्थापन : कोरडवाहू शेती कोरडवाहू ही शेती पद्धती पारंपरिक असून त्यात मुख्यतः खरीप व रब्बी पिके घेतली जातात हे पावसाच्या पाण्यावरची असल्यामुळे ती शाश्वत नसून शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात येतात. कारण कोरडवाहू पिकाचे उत्पादन अतिशय कमी प्रमाणात मिळते. वाढत्या लोकसंख्यामुळे लागवडी खालील क्षेत्र घटत चालले आहे दरडोई जमीन धारणा ही कमी होत चालली आहे. बदलत्या वविसंगत हवामानामुळे शेती उत्पादन कमी होत चालले आहे. व त्याची अनेक कारणे खालील प्रमाणे आहेत. – कोरडवाहू शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान जास्त काळ न टिकणे. – पाऊस कमी झाल्यास शिफारस केलेल्या खताच्या मात्रा सुद्धा अंमलात येत नाहीत. – कृषी पूरक व्यवसायाचे अपुरे ज्ञान. – अपूर्ण शिक्षण झालेले तरुण व ज्यांनी शिक्षण घेतलेले आहे. स्वतःच्या जवळच्या उपलब्ध साधन सामग्री विकसित करून उत्पादित करण्याच्या दृष्टीने सयुंक्तिक शिक्षण घेतलेल्या तरुणाच्या समस्या या कारणामुळे मर्यादित जमिनीवर भर वादात असल्याने, अशा परिस्थितीमध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब या व्ययसायाला पुनर्जीवन व संजीवनी देणारा ठरू शकतो. काय असते एकात्मिक...