पोस्ट्स

विमा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Pashudhan Bima Yojana : जनावरांच्या आकस्मिक मृत्यूवर मिळणार नुकसानभरपाई, जाणून घ्या कशी?

इमेज
Pashudhan Bima Yojana : जनावरांच्या आकस्मिक मृत्यूवर मिळणार नुकसानभरपाई, जाणून घ्या कशी? सध्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटविषयी आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अर्थात शेती व्यवसाय येतो त्याचबरोबर पशुसंवर्धन, पशुपालनाचा व्यवसायही येत असतो. बोलायचे झाले तर त्याची दोन साधने म्हणजे शेती आणि पशुसंवर्धन. बहुतांश शेतकरी गाई-म्हशींचे पालनपोषण करून चांगला नफा कमावत आहेत. परंतु अनेकदा शेतकरी पिकांच्या आणि प्राण्यांच्या असुरक्षिततेबद्दल चिंतेत असतात, जसे की नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाले तर नाहींना किंवा जनावरे कोणत्याही रोग, हवामान किंवा अपघातास बळी पडले नाहीत ना. पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱअयांना नुकसान भरपाई मिळत असते. सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळत असते. शेतकरी पिकांसाठी पीक विम्याचा लाभ नुकसान भरपाई मिळून घेत असतात. मात्र जनावरांचा विमा काढण्यास विसरतात, त्यामुळे शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी पशुधन विमा योजना सुरू केली आहे. (Pashudhan Bima Yojana) याअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. तर मग आम्ही त...

पती-पत्नी दोघे घेऊ शकता का पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा; जाणुन घ्या काय आहेत नियम

इमेज
पती-पत्नी दोघे घेऊ शकता का पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा; जाणुन घ्या काय आहेत नियम नमस्कार आपणही शेतकरी आहात का? मग तुम्हीही घेत असाल ना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा? मग हि बातमी तुमच्यासाठी खास आहे. केंद्रातील मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. ह्या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपया प्रमाणे एका वर्षात तीन हफ्ते दिले जातात. म्हणजे 6000 रु वार्षिक दिले जातात. ह्या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात. शेतकरी मित्रांनो ह्या पीएम किसान चे आतापर्यंत 9 हफ्ते शेतकऱ्यांना भेटले आहेत आणि लवकरच दहावा हफ्ता देखील शेतकऱ्यांना भेटणार आहे. आता प्रश्न असा आहे की, शेतकरी पती पत्नी दोघेही ह्या योजनेसाठी अँप्लाय करतात, मग त्या दोघांना ह्या योजनेचा फायदा मिळेल काय? तुम्हाला हि हा प्रश्न पडला असेल हो ना! मग आज आपण ह्या प्रश्नाचे उत्तर जाणुन घेऊया. शेतकरी मित्रांनो जर पती पत्नी ह्या दोघांनी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अँप्लिकेशन दिले असेल, तर ह्या योजनेद्वारे फक्त एकालाच म्हणजे पती ...

शेतकऱ्यांना आता घरबसल्या नोंदवता येईल पीक नुकसानीची माहिती

इमेज
  शेतकऱ्यांना आता घरबसल्या नोंदवता येईल पीक नुकसानीची माहिती पुणे : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. पण विमा कंपन्यांना त्यांच्या नियमानुसार दिलेल्या मुदतीत नुकसानीची माहिती देता आली नाही, केवळ या एकाच कारणाने विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने (central goverment) दिलासा दिला आहे. यानुसार पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (prime minister crop insurance scheme) खास अॅप विकसित केले आहे. याला ‘क्रॉप इन्शुरन्स अॅप’ असे नाव दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातील पीक नुकसानीची माहिती घरबसल्या नोंदविता येणार आहे.राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती ही या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या विमा कंपन्यांना निश्‍चित मुदतीत देता येणार आहे.   खरीप हंगामातील पिकांसाठी गेल्या वर्षीपासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीने पिकाच्या नुकसानीची माहिती ही नुक...