पोस्ट्स

तज्ञ सांगताहेत अशी करा बीजप्रक्रिया पिकांना मोठा फायदा होईल

इमेज
तज्ञ सांगताहेत अशी करा बीजप्रक्रिया पिकांना मोठा फायदा होईल मान्सून पूर्व कापूस लागवडीला सुरुवात झाली असून, बरेच शेतकरी बीज प्रक्रिया करीत नाहीत, बीज प्रक्रिया केल्यामुळे खूप फायदे होतात. कंपनी कडून आलेल्या बियांण्याला गौचो सारख्या औषधांची बीजप्रक्रिया केलेली असते,आपण ते बियाणे लागवड करतो.आपल्या पिकावर कमी रोग पडावेत, तसेच नत्र, स्फुरद,पालाश स्थिरीकरण व विरघडवण्यासाठी विविध प्रकारच्या जिवाणू खतांची प्रक्रिया करावी. त्यात ऍझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी, विविध प्रकारची बुरशी नाशके यांची बीज प्रक्रिया केल्यामुळे काय फायदे होतात व कोणत्या कोणत्या जिवाणूंची व कशी कोणत्या क्रमाने बीजप्रक्रिया करावी या विषयीची माहिती आपण आज पाहू.बियाणद्वारे उदभवणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया हा कमी खर्चाचा उपाय आहे.यावरुन बियाणे प्रक्रियेचे महत्व आपल्या लक्षात येईल,या अनुषंगाने शेतकरी बांधवांना आवाहान करण्यात येते की कोणतेही बियाणे बिजप्रकिया केल्याशिवाय पेरु नये. जिवाणु संवर्धकाची बिजप्रकिया -२५० ग्रॅम जीवाणु सवर्धकाचे पाकिट १० ते १५ किलो बियाण्यास वापरावे १ लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅ...

जनावरांचे वय ओळखायचे तरी कसे? वाचा!

इमेज
जनावरांचे वय ओळखायचे तरी कसे? वाचा! जनावरांचे वय ओळखता येणे अनेक अंगानी गरजचे आहे. अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते. साधारणतः विचार केला तर जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून, शिंगांवरील वलयांच्या संख्येवरून आणि जनावरांच्या दातांच्या संख्येवरून त्यांच्या वयाचा अंदाज बांधता येतो. त्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील… अ) जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून ओळखा : 1) जनावरांचे निरीक्षण केले तर लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे अशा वयोगटात त्यांचे विभाजन करता येते. 2) लहान जनावरे या गटात वासरांचा, तरुण जनावरांमध्ये आकाराने लहान असलेली, अंगात चपळपणा, मऊ व घट्ट कातडी, शरीरावरील केस मऊ व दातांची पूर्ण रचना असणारी जनावरे येतील. 3) म्हातारी जनावरे म्हणजे आकाराने मोठी, शांत स्वभावाची, सैल कातडी व दातांची अपूर्ण रचना असलेली होय. मर्यादा काय? : यामध्ये नेमके वय समजणे कठीण आहे. बाजारात विक्रीकरिता जनावरे पाहिल्यानंतर फजिती होऊ शकते. ब) जनावरांची शिंगे व वलयांची संख्या : 1) जनावरांची शिंगे बारकाईने पहिली तर त्यावर वलय स्पष्ट दिसते. 2) जनावरांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या शिंगांवरील वलयांची संख्या व आ...

Seed Germination process : बियाण्यांची उगवण क्षमता पेरणाधीच कशी तपासायची?

इमेज
Seed Germination process : बियाण्यांची उगवण क्षमता पेरणाधीच कशी तपासायची? दुकानातून बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकरी त्यांची थेट शेतात पेरणी करतो आणि मग जवळपास आठवड्याभरानं ते पाहायला जातो. त्यावेळी त्याची निराशा होते. कारण, बहुतेक ठिकाणी बियाणं उगवून आलं नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. अशावेळी शेतकऱ्याला पुन्हा एकदा बियाणं खरेदी करावं लागतं. यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो. थोडक्यात काय शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट येतं. पण, हे टाळण्यासाठी शेतकरी घरबसल्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो. म्हणजे पेरणी करण्याआधीच आपण जे बियाणं पेरणार आहोत, त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहू शकतो. ते कसं याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती बियाण्यांची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासणं. बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती अशा आहेत, ज्या शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतात. पहिली म्हणजे गोणपाट पद्धत . या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपास...

*पीक फेरपालटीचे फायदे

इमेज
*पीक फेरपालटीचे फायदे * *पीक फेरपालट ही एक प्राचीन  कृषी पद्धती आहे. वर्षानुवर्षे प्रत्यक्ष अभ्यासाने यात बदल होत आलेले आहेत.*  *१) जमिनीची सुपीकता वाढते.* विशिष्ट पीक हे जमिनीत विशिष्ट प्रकारची तत्वे सोडतात. तर काही विशिष्ट प्रकारची अन्नद्रव्ये शोषतात. त्यामुळे पिकांच्या फेरपालटाने जमिनीतील या पोषक तत्वांचे संतुलन होते व जमिनीची सुपिकता वाढते *२) पीकांचे उत्पादन वाढते.* फेरपालटीमुळे जमिनीतील न वापर झालेल्या अन्नद्रव्यांचा, साधनांचा वापर होतो व पीकांचे उत्पादन वाढते.  *३) मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते.* विशिष्ट पीकांमुळे मातीतील विशिष्ट प्रकारचे जिवाणू समृद्ध होत असतात त्यामुळे मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते त्यामुळे  माती सुपीक व संतुलित बनते.   *४) रोग व कीडींना आळा बसतो.* फेरपालटीने रोग व कीड यांचा जीवन क्रम थांबतो. त्यांचे निवासस्थान नसल्याने त्यांची पुढील पिढी बंद होते. रोग व किडे पुढील पीकांत संक्रमित होण्याचा धोका टळतो.  *५) मातीच्या संरचनेत सुधारणा  होते.* पीक फेरपालटीने मातीच्या संरचनेत ही लक्षणीय सुधारणा होऊन परिणामी उत्प...

ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे

इमेज
ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे ज्या जमिनीमध्ये सातत्याने उसाची लागवड करण्यात येते अशा जमिनीत सेंद्रिय खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केला जातो. अशा प्रकारच्याजमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण खूप जास्त प्रमाणात झाल्यानेजमिनीमध्ये त्यांची कमतरता आढळते. त्यामुळे ऊस पिकातील कमतरतेची लक्षणे जाणून घेऊन शिफारशीत मात्रेत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. ऊस पिकातील जोमदार वाढ आणि उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे आणि त्यांचे कार्य जाणून घेऊ.   ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्य आणि कमतरतेची लक्षणे           ऊस पिकातील लोहाचे कार्य 1- हरितद्रव्य तयार करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. 2- पानांचा रंग गडद हिरवा तयार होण्यास मदत होते. 3- इतर अन्नद्रव्यांच्या शोषणासाठी मदत करते. 4- झाडांच्या वाढीस व प्रजननास आवश्यक. 5- नवीन येणारी पाने पिवळी दिसतात व शिरा ...

एप्रिल महिन्यात करा या पिकांची पेरणी , मिळेल भरपूर नफा.

इमेज
एप्रिल महिन्यात करा या पिकांची पेरणी , मिळेल भरपूर नफा. एप्रिल महिन्यात पेरणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती एप्रिल महिना असा आहे की रब्बी पिकांची काढणी झाली आहे आणि ही पिके मंडईत विकून शेतकरी शेतीपासून मुक्त झाला आहे. यानंतर शेतकरी पुढील जैद पिकांच्या तयारीला लागले आहेत. एप्रिलमध्ये गव्हाची काढणी आणि जूनमध्ये भात/मका पेरणी दरम्यान, शेत सुमारे 50 ते 60 दिवस रिकामे राहते. सध्या, शेतकरी या रिकाम्या शेतात फळबाग, भाजीपाला लागवड आणि अनेक नगदी पिके करून भात/मका पेरण्यापूर्वी 50 ते 60 दिवसांत रोख कमाई करू शकतात. यावेळी, शेतकरी त्यांच्या काही कमकुवत शेतात हिरवळीचे खत तयार करण्यासाठी धैंचा, चवळी किंवा मूग इत्यादी पिके घेऊ शकतात. या प्रकारच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याबरोबरच खताच्या खर्चातूनही सुटका होते. कारण या पिकांपासून उत्पन्न मिळाल्यानंतर शेतकरी जूनमध्ये पेरणी केलेल्या पिकाची लागवड करण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस किंवा मका पेरणीपूर्वी 10-15 दिवस आधी मातीची नांगरणी करून जमिनीचे आरोग्य सुधारतो. आणि जमिनीची सुपीकता वाढते. या महिन्यात तुमच्या शेतातील मातीची चाचणी करून ...

ऊष्णतेच्या कालावधीत शेतातील पानी व्यवस्थापन करणे गरजेचे

इमेज
ऊष्णतेच्या कालावधीत शेतातील पानी व्यवस्थापन करणे गरजेचे उन्हाळा लागल्याने पाण्याची टंचाई सगळीकडे भासू लागते त्यामुळे त्यामध्ये पाणी याला खूप महत्त्वाचे स्थान आहे उन्हाळा लागल्याने तीव्र उष्णता प्रत्येक प्राण्यांना जाणवणे हे साहजिक च आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुद्धा पाण्याची ची टंचाई भासू लागते. प्रत्येकाला पाण्याची नितांत गरज असते जसे माणसाला पिण्यासाठी, वापरण्यासाठी लागते. तसे च इतर प्राण्यांना सुद्धा पाण्याची नितांत गरज असते ती पिण्यासाठी. त्यामुळे उन्हाळा लागला की आपण पाण्याचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे. जेवढे पाणी लागते तेवढ्याच पाण्याचा वापर केला पाहिजे व आपल्या सोबतच अनेक जीवांना सुद्धा पाण्याची गरज पूर्ण होऊ द्यायला पाहिजे. तर आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णाच्या कालावधीत शेतीत पाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. ते कशा प्रकारे करावे शेतकरी बंधूंनो सध्या राज्यात ऊष्णतेची लाट वाढत आहे.पारा 45 अंश सेल्सिअस च्या वर जात आहे.या कालावधीत पिकास ठिबकद्वारे पाणी पुरवठा शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा ल्याटरल मधील पाणी गरम झालेले नाही हे बघूनच पाणी पुरवठा करावा. भूपृष्ठावर मोठ...