पोस्ट्स

फायद्याची फणस शेती

इमेज
फायद्याची फणस शेती फणस हे नगदी पीक म्हणून फायदेशीर ठरू शकते. दक्षिणेकडील राज्यांतील फणस शेती पाहिल्यास याची साक्ष पटू शकते. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये या फळाला फार वरचे स्थान आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत फणसाचे विविध पदार्थ विकून आणि निर्यात करून चांगली कमाई केली जात आहे. मोठय़ा प्रमाणावर फणस लागवड झाल्यास कोकणात त्यावर मोठा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकेल. हवामान व जमीन : या वृक्षाला थंड हवामान आणि तीव्र उन्हाळा सोसत नाही, पण उष्ण-दमट हवामान आणि मध्यम पाऊस असणाऱ्या भागात त्याची चांगली वाढ होऊ शकते. लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर करता येते. पण खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत वाढ चांगली होते. काळ्या चिकण मातीत फळे उशिरा आणि कमी धरतात. समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये हा वृक्ष वाढू शकतो. पण १२०० मीटर उंचीवरच्या भागातील फळे कमी दर्जाची असतात. फणसाच्या जाती : फणसाच्या फळांचे कापा आणि बरका (रसाळ) हे दोन मुख्य प्रकार पडतात. कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. कापा जातिचे फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो....

शेतात कोळपणी करणे म्हणजे काय? जाणून घ्या कोळपणी करण्याचे फायदे व प्रकार..

इमेज
शेतात कोळपणी करणे म्हणजे काय? जाणून घ्या कोळपणी करण्याचे फायदे व प्रकार.. भारतीय शेती पद्धतीची (Indian Agriculture)परंपरा फार पुरातन आहे. प्राचीन काळापासूनच निरनिराळ्या शेती पद्धतींचा अवलंब केला जात आहे. (Weather) हवामान, जमिनीचा प्रकार (Types of soil )इ. गोष्टी लक्षात घेता भारतीय शेती नैसर्गिक रीत्या विविध भागांत विभागली गेली आहे. या कारणामुळेच प्रत्येक विभागातील शेती अवजारांची बनावट आवश्यकतेनुसार निरनिराळी आहे. Secondary Tillage भारतात दरवर्षीच पिकातील तण नियंत्रणासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतात पेरणी झाल्यानंतर तीन, सहा, किंवा नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी करतात. प्रत्येक शेतीची सुरूवातीची पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिकाव्यातिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते, यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते कोळपणीचे फायदे : • कमीत कमी खर्चात व वेळत तण निंयञण होते. • जमिनीत हवा खेळती राहते तसेच उत्पादनात देखील वा...

जाणून घ्या वेस्ट डिकंपोजर विषयी महत्वाच्या बाबी ओळख, वापर, बनविण्याच्या पद्धती, फायदे

इमेज
जाणून घ्या वेस्ट डिकंपोजर विषयी महत्वाच्या बाबी ओळख, वापर, बनविण्याच्या पद्धती, फायदे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. गायीच्या शेणातील जिवाणू पासुन तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामधे पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनिच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो.It can be used in various ways for soil fertility, crop growth and protection.ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे. साहित्य - वेस्ट डि कंपोजर २ किलो गुळ२०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)२०० ल...

चुकून तणनाशक फवारले गेले तर काळजी करू नका करा फक्त हे सोप्पे उपाय

इमेज
चुकून तणनाशक फवारले गेले तर काळजी करू नका करा फक्त हे सोप्पे उपाय कोणत्याही पिकावर चुकून आंतरप्रवाही तणनाशक मारले गेले असल्यास ,त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो स्पर्षजन्न तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, 15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी(डायअमोनियम फॉस्फेट ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . टीप- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी करा Spray solution of jaggery and DAP on affected crop 4 times at 7/7 hour interval.केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो.बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2...

*असे करा गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन*

इमेज
🐌 * शंखू गोगलगायींपासून पिकांना धोका*  गोगलगाय ही एक बहुभक्षी प्रकारची किड असून. ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे नुकसान करते. गोगलगाय किडीच्या नियंत्रणासाठी  १) खुराकाच मोकळं पोत एक किलो गुळाच्या पाण्यात बुडवून संध्याकाळी शेतात टाकावीत, त्यावर गोगलगाय आकर्षित होईल नंतर ते जमा करून त्यावर औषधाची फवारणी करावी  २) मोसंबी, डाळिंब,व इतर बागेत दरवर्षी खोडावर बोर्डो पेस्ट लावावे म्हणजे गोगलगाय झाडावर चढणार नाही.  ३) गोगलगाय नियंञणासाठी मेटाअल्डीहाइड २.५%असणारे स्नेलकिल हे मॉलुस्कीसाईड वापरावे  ४) तंबाखू पावडर ची शेताच्या सर्व बाजूने रेषा ओढायची म्हणजे गोगलगाय आत येणार नाही.  🌱सद्य परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोगलगायींना वेळीच ओळखून उपाययोजना करावे.  🧐 * असे करा गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन* 👇 ▪️शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा र...

सोयाबीन उगवणी नंतर 10 ते 25 दिवसा पर्यंत पिवळे कशामुळे पडते पहा

इमेज
सोयाबीन उगवणी नंतर 10 ते 25 दिवसा पर्यंत पिवळे कशामुळे पडते पहा आपल्या जमिनिमधे साधारणपणे चुनखडीचे ( C2CO3) कँल्शियम कार्बोनेट चे प्रमाण 4 ते 5% पेक्षा कमी असयला हवे.ज्या जमिनिमधे मुक्त चुनखडीचे प्रमाण 8 ते 9% च्या पुढे असते ( चुनखडीयुक्त व पांढरी जमीन) त्या वेळी जमिनितुन 6 सूक्ष्म खतांपैकी फेरस (लोह) या खताची अजिबात उपलब्धता होत नाही.त्याच्या खालोखाल झिंक आणि मॉलिब्डेनम खताची उपलब्धता फार कमी असते.म्हणून अशा जमिनिमधे सुरुवातीला सोयाबीन पिवळे पडते. त्यामुळे अशा जमिनित 1) सोयाबीन ची वाढ खुरटी होते व पाने पुर्ण पणे पिवळे पडते2) झाडाची वाढ मंदावते व पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात3) सर्व पाने हरीतद्रव्यरहित राहुन करपल्या सारखी दिसतात हे लक्षात घ्या - सोयाबीन पिवळे पडण्यामाघे पानामधे संपुर्ण फेरस (लोह) खताची कमतरता असते.चुन खडियुक्त शेतामधुन पिकाला फेरस ( लोहाची) उप्लब्धता होत नसल्या मुळे पानामधे लोहाची कमतरता दिसते. अनेक शेतकरी या पिवळ्या सोयाबीनला *यल्लो मोझँक व्हायरस असे संबोधतात.आणि कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारण्या घेउन खर्च वाढवतात.आपण हे समजुन घेतले पाहिजे की पिकाच्या पा...

कापूस पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

इमेज
कापूस पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स BT कापसाला मध्यम व भारी जमीन खुप मानवते.त्यासाठी अशाच जमिनीत कापसाची लागवड करावी. तसेच सिंचन सुविधा नसलेल्या हलक्या जमिनीत कापुस लागवड शक्यतो टाळावी.जमिनीच्या प्रकारानुसार समतल पेरणी,जमिनीच्या उताराला आडवी पेरणी,सरी वरंबा पध्दतीने मशागत इ. मुलस्थानी जलसंधारण तंत्राचा अवलंब करावा.कोरडवाहू क्षेत्रामध्ये बिगर बी.टी.कपाशीच्या सरळ वाणांची अतिघन पध्दतीने लागवड केल्यास बी.टी. वाणा इतकेच उत्पादन मिळू शकते.सरळ वाणांचे बियाणे घरच्या घरी तयार करुन त्याचा वापर करावा.बीबीएफ यंत्राचा वापर करुन पेरणी करावी, जेणेकरुन पावसाचे पाणी साठवून ठेवण्यास मदत होऊन ओलावा अधिक काळ टिकतो व अतिपावसाच्या वेळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.यामुळे बियाणे, खत व मजुर खर्चात बचत होते.  कापूस पिकात भूईमूग (१:१), मूग किंवा उड़ीद (१:१), सोयाबीन (१:१ किंवा २:१) या आंतरपीक पध्दतीचा अवलंबकरावा.आपल्या विभागामध्ये कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्य योग्य कालावधीमध्ये पेरणी केल्यास कीड व रोग यांचा प्रादुर्भाव टाळता येतो.तण नियंत्रणासाठी पेरणीपुर्व तणन...