रब्बी आणि उंडली पिके कृषी सल्ला
*रब्बी आणि उन्हाळी पिके कृषी सल्ला*
🙏🙏
नमस्कार शेतकरी बंधुनो,
ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून सुरु होणारा रब्बीहंगाम यावर्षी थोडा उशिरा सुरु झाला. नोव्हेम्बर महिन्यात कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात सेंद्री/गुलाबी अळीचा हल्ला झाल्यामुळे आणि सर्वत्र पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने यावर्षी कापूस काढून रब्बीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली/होत आहे. मका ज्वारी दादर/शाळू हरबरा कांदा, गव्हू, हि रब्बीची मुख्य पिके आहेत, त्यांच्या लागवडीत यावर्षी चांगलीच वाढ झाली आहे
*मका,रब्बी ज्वारी, दादर/शाळू*
या पिकांवर कधी नव्हे, इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकन लष्करी अळी पडली, या अळी च्या बंदोबस्ता साठी डेसीस 100 डेलिगेट कोराजन, आवांट अशी फवारणी करूनही अळी आटोक्यात आली नाही शेतकऱ्यांनी 2/2, 3/3 वेळा अळी नाशकाचे फवारणी करून प्रत्येक शेतकरी अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
अमेरिकन लष्करीअळी नियंत्रणा साठी डेसीस आंणि क्विनॉलफॉस या कॉम्बिनेशचा फॉसफोरफाईव्हचा आणि फायटर या सेंद्रियअळी नाशकाचा ज्या शेतकऱ्यांनी उपयोग केला त्यांना चांगला फायदा झालेला दिसतो, दीर्घ काळपर्यंत अळी नियंत्रणात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मका या पिकाला झिंक लव्हिंग प्लांट म्हणतात, साधारणतः 30/35 दिवसाचे पीक झाल्यावर चिलेटेड झिंक 20 ग्रॅम फवारणी करावी, खताच्या दुसऱ्या हप्त्यात 40/45 दिवसांनी 10 किलो झिंक सल्फेट द्यावे वापसा स्थितीतच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात मका निसवल्या नंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत 2 पाणी अत्यंत आवश्यक असतात. मक्याचे पीक निसवल्यानंतर एकरी 200 ते 300 ग्रॅम चिलेटेड झिंक आणि 2/3 किलो पोट्टयाशियम पोलीफॉस्फेट दिल्याने मक्याच्या उत्पन्नात चांगली वाढ होते.उन्हाळी मका लागवड डिसेंम्बरच्या 15 तारखेपर्यंतच करतात पण ह्यावर्षी जास्त पाऊस आणि हिवाळा थोडा उशिरा सुरु झाल्यामुळे थंडीचे प्रमाण 15/20 फेब्रुवारी पर्यंत चांगले राहील, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 30 डिसेंबर पर्यंत मक्याची लागवड केली असेल त्यांना चांगले उत्पन्न अपेक्षीत आहे,1 जानेवारी नंतर मका लागवडीला जसजसा उशीर होईल तसतसे उत्पन्नात घट होईल. 10 जानेवारी नंतर लागवड केलेल्या मक्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येईल. माझ्यामते 10 जानेवारी नंतर लागवड केलेल्या मक्याचे उत्पन्न निम्म्यावर येईल.
रब्बी ज्वारी दादर/शाळू या पिकांना आवश्यकतेनुसार पीक शेलपानावर असताना, म्हणजे निसवत असताना पाण्याची एक वेळ आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत एक वेळ असे दोन वेळा पाणी दिल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते.
*गव्हू*
गव्हू या पीकाला थंडी चांगली मानवते, गव्हाचे चांगले उत्पन्न येण्यासाठी 4 ते 5 वेळा सिंचनाची आवस्यकता असते
1)उगवणीच्या वेळी पेरणीनंतर
2) 22 ते 25 दिवसांनी मुकुट मुळे फुटण्याच्या अवस्थेत,
3) कांडी धरण्याच्या अवस्थेत म्हणजे 40/42 दिवसांनी,
4) गव्हू निसवताना,म्हणजे 60/62 दिवसांनी
5) गव्हाच्या दाण्यात चीक भरण्याची किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे साधारणतः 80/82 व्या दिवशी.
वरील प्रमाणे पाण्याचे नियोजन करावे.
*गव्हू या पिकाला पेरणीनंतर दुसरे पाणी 20/22 दिवसांनी दिले तर फुटव्यांची संख्या चांगली वाढते.*
यावर्षी वाईट हवामानामुळे मावा, अळी, करपा, तांबेरा या रोगांना गव्हाचे पीक बळी पडेल, त्यासाठी मावा आणि अळी नाशकासोबत एम 45 आणि कार्बेनडिझम या बुरशी नाशकांचा वापर करावा.
*गव्हू निसल्यानंतर परुंतु ओंबी पकव होण्यापूर्वी मायको सी सी 25/30 मिली फवारणी करावी तसेच याच अवस्थेत 100 ग्रॅम 19/19/19 आणि 40 ग्रॅम पोट्टयाशियम पोली फॉस्फेटची फवारणी घ्यावी उत्पन्नात चांगली वाढ होईल*
*हरबरा*
अत्यन्त कमी पाण्यात येणारे पीक आहे, उगवणीच्या वेळी एक ,दुसरे 35 दिवसांनी आणि 3 रे 70/75 व्या दिवशी अशा तीनच पाण्यात हे पीक घ्यावे कोरडमध्ये जमिनीतील वापशावर उगवण झाली असल्यास पेरणीनंतर 40 आणि 75 व्या दिवशी असे दोनच पाण्यात हे पीक चांगले येते. हरबऱ्याला जास्त पाणी दिल्यास मर किंवा उभळ खूप होते यासाठी हलके पाणी देणे उपयुक्त ठरते,पाट पाण्यापेक्षा तुषार सिंचनाने किंवा ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास उत्पन्नात चांगली वाढ होते. या पिकाला खतांची खूप आवस्यकता नसते, आमच्या चोपडा जिल्हा जळगाव भागात बरेच शेतकरी कोणतेच रासायनिक खत न देता हरभऱ्याचे चांगले उत्पन्न घेतात,
पीक एक दीड महिन्याचे झाल्यावर 19/19/19 100 ग्रॅम आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएन्ट 20 ग्रॅम अशी फवारणी घेतल्यास उत्पन्नात वाढ होते.हरबरा या पिकाला पूर्ण फुल लागल्यावर घाटे सेट झाल्यावरच दुसरे पाणी द्यावे, फुलावर असताना पाणी दिल्यास मोठ्या प्रमाणात फुलगळ होते या पिकाला साधारणतः55 ते 60 व्या दिवशी फुलोरा अवस्थेत आणि 70 ते 75 व्या दिवशी, मायको सी सी 20 ते 30 मिली फवारणी करावी उत्पन्नात चांगली वाढ होते
*कांदा*
1जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत मध्यप्रदेश,राजस्थान आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यात अवकाळी पावसामुळे कांदा या पिकावर मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता आहे. कांदा, कांद्याचे रोप, आणि बिजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्यावर रिजेन्ट, स्टिकर, आणि एम45, कार्बेनडीझम, झायनेब 78, आल्व्हीस यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकांची 1/2 वेळा फवारणी करावी.या पडलेल्या पावसामुळे काढणीला आलेला खरीप लाल कांद्याला 8/10 दिवस उशीर होईल, त्यामुळे लाल कांद्याची आवक कमी होईल आणि उन्हाळ कांदाही संपेल, त्यामुळे येणाऱ्या 8/10 दिवसात 1 फेब्रुवारीपर्यंत लाल व उन्हाळ दोन्ही कांदयांची आवक कमी होईल, येणाऱ्या 8/10 दिवसात कांद्याचे भावात चांगली तेजी येण्याची/ सुधारणा होण्याची शक्यता आहे. आणी हे भाव साधारणतः 20 फेब्रुवारी पर्यंत टिकून राहतील असे माझे मत आहे.
*उन्हाळी पिके*
भुईमूग, बाजरी वैशाखी मूग, उन्हाळी तीळ गवार कांदा सोयाबीन वेलवर्गीय भाजीपाला पिके ढेमसे कार्ले गिळले दोडके खरबूज, टरभुज, काकडी या पिकांची लागवड साधारणतः 20 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत केली जाते.15 फेब्रुवारीनंतर लावलेल्या उन्हाळी पिकांच्या उत्पन्नात जसजशी लागवड उशिरा होते तसतसे उत्पन्नात घट होत जाते त्यासाठी कोणतेही उन्हाळी पीक 15 फेब्रुवारीच्या आतच लागवड करावी.
*भगवती सिड्सच्या सर्व (35) ग्रुप्स* वर उन्हाळी पिकांची सविस्तर माहिती, 4 डिसेंम्बर ते 12 डिसेंम्बर दरम्यान दिलेली आहे, ती पाहावी आणि ज्या शेतकरी बंधूनी जी जी पिके लागवड केली असतील, त्या पीकांची माहिती आपल्या स्वतःच्या माहितीसाठी (*) स्टार करून ठेवावी.
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा