वाफसा वाफसा म्हणजे काय ?

 *_🥀वाफसा वाफसा म्हणजे काय ?🥀_*


*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

_कृषि विध्यापीठे खोटे बोलतात की, मुळ्यांना पाणी पाहिजे पण नैसर्गिक सत्य हे आहे की कोणत्याही झाडाच्या मुळीला पाणी नको झाड पाणी पीत नाही किंबहुना मुळी पाण्याला स्पर्शही करत नाही मुळ्यांना पाणी नको तर वाफसा हवा आपण बीजामृत संस्कार केला जीवाम्रुत देऊन आच्छादन केले पण मुळीजवळ वाफसा नसेल तर पिकाचीत वाढ होणार नाही ही चारही तत्वे ( बीजाम्रुत जीवाम्रुत आच्छादन व वाफसा ) एकमेकाशी इतके जुळलेले आहेत की यापैकी एकाला ही टाळता  येणार नाही "This is complete package of practices "ही चारही तत्वे अंमलात आनाविच लागतील_ *_उदा_*

*_१) गादी वाफ्यात कांदे किंवा लसुण लावतो :_* _वाफ्याच्या काटाचे कांदे मोठे होतात कारण तेथे वाफसा असतो_ 

*_२) उंच सखल भाग :_* _त्यात तूर पेरली सखल भागातील तूर खुरटी व उंच भागातील तूर जोमदार दिसेल कारण वाफसा जमिनीच्या पृष्ठभागाखाली मुळ्याच्या परिसरात दोन माती कणाच्यामध्ये ज्या पोकळया असतात त्या पोकळयामध्ये पाण्याचे अस्तित्व नको तर पोकळयामध्ये ५० % पाण्याची वाफ व ५० % हवा यांचे सन्मिश्रन हवे या एकूण स्थितिला "वाफसा" म्हणतात_

     _जेव्हा आपण सिंचनाचे पाणी देतो आणि पुढे १५ दिवस पाणी ( पाळी ) येणार नाही म्हणुन कुंभस्नान  घालतो त्यामुळे २ मातीच्या कणामध्ये ज्या पोकळ्या असतात त्या सर्व पाण्याने भरून जातात व तेथील हवा निघुन जाते वाफा पाण्याने गच्च भरतो तेव्हा बुड-बुड असा जो आवाज येतो तो त्या निघुन जाणाऱ्या हवेचा असतो परीणामी मुळ्या व जीवानुना oxygen मिळत नाही आणि जीवाणु मरतात व मुळया कुजतात मुळाकडुन अन्नाचि होणारी उचल ( Mineral Uptake ) थांबते त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात, वाढ खुंटते अर्थातच उत्पादनात घट. म्हणून पाणी एवढे दिले पाहिजे की, मातीच्या दोन कनामधिल पोकळयात पाणी साठणार नाही, तर त्या पाण्याची वाफ जमिनीतील उष्णतेने होईल ( जास्त पाणी दिले तर जमीन थंड पड़ते व वाफ बनत नाही ) व त्या पोकळयामध्ये ५० % पाण्याची वाफ व ५० % हवा यांचे सन्मिश्रण होईल एवढेच पाणी द्यावे समजा जमिनीत अंगभुत उष्णता आहे जेणेकरुन त्या उष्णतेणे प्रति मिनट २ लीटर पाण्याची वाफ होते तेव्हा २ लीटर पाणी दिले तर वाफसा होईल पण जर आपण २ लीटर ऐवजी ४ लीटर पाणी दिले तर २ लीटर पाण्याची वाफ बनेल व २ ली पाणी तसेच राहील व वाफसा राहणार नाही म्हणून जमिनीला एवढेच पाणी दिले पाहिजे जेणेकरून मुळीजवळ वाफसा राहील व अतिरिक्त पाणी गांडूळानी पाडलेल्या छिद्रातुन भूजल साठ्याकडे निघुन जाईल व वाफसा कायम राहील._


*_जमिनीत वाफसा कसा निर्माण करावा :_* _कोणत्याही झाडांची दुपारी १२ वाजता ज्या ठिकाणी सावली पडते त्या सावलीच्या कडेला (सीमेवर ) अन्न व वाफसा घेणारी मुळी असते. वाफसा व अन्न घेणारी मुळी सावलीच्या आतमध्ये अजिबात नसते. आपण जर सीमेवर पाणी दिले म्हणजेच मुळीच्या तोंडात पाणी ओतले तर तर अशावेळी वाफसा किती घ्यावा हे मुळीने ठरवले नाही तर आपण ठरविल. खरेतर वाफसा किती घ्यावा हे ठरविण्याचा अधिकार मुळीचा आहे आपला नाही म्हणूनच मुळयाचा तोंडात त्यांच्या मनाविरुद्ध ओततो म्हणुन वाफसा निर्माण होत नाही तेव्हा सावलीच्या  बाहेर / सीमेपासुन ६" बाहेर ड्रीपर टाकुन व निचरासाठी नाली काढुन दिली तर मुळी त्या पाण्यापर्यंन्त जाईल व पाहिजे तेवढा वाफसा निर्माण होईल. सीमेच्या आतमध्ये जर पावसाचे पाणी किंवा सिंचनाचे पाणी भरले तर मुळयाजवळ पोकळया पाण्याने भरतात व मुळया सडतात झाडांची सड़ होते झाड पिवळे पडते_ *_(उदा._* _मोसन्बिच्या झाडावर डींक = खोडातून स्त्रव वाहने ) म्हणुन सावलीच्या आतमध्ये पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमा होऊ देऊ नये. ते पाणी ताबडतोब बाहेर काढुन देण्याची व्यवस्था करावी हे अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी झाडाच्या खोडापासुन झाडाच्या सीमेपर्यन्त उतारता थर देऊन पाणी काढुन दिले पाहिजे जेणेकरून पाणी निघुन जाईल मुळ सड़ होणार नाही सावलीच्या आतील पाणी काढुनदिले तरी अतिरिक्त ओलावा असतोच असतो तो काढुन देण्यासाठी व वाफसा निर्माण करण्यासाठी सीमेपासून ६" वर नाली काढतो तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्तीने जास्त दाबाकडूण कमी दाबाकडे म्हणजे मुळयापासून नालीत आपोआप उतरतो व मुळीजवळ वाफसा सतत रहातो._

*✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?