खरीप तोंडावर, मात्र अद्याप रब्बीची खरेदीही नाही*
*👨🌾 खरीप तोंडावर, मात्र अद्याप रब्बीची खरेदीही नाही*
*🎯 रब्बी हंगाम संपून* खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप राज्यातील रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नसल्याने या केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
*💁♀️ दरम्यान राज्यातील १६ जिल्ह्यांमधून* तीन लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
*👉🏻 जळगाव आणि बुलडाणा* या दोन जिल्ह्यांना ६० हजार क्विंटल रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांना केवळ प्रतिजिल्हा ५०० क्विंटल रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
*💁♂️ राज्यात मार्केटिंग* फेडरेशनमार्फत रब्बी पणन हंगाम २०२०-२१ मध्येे आधारभूत किमतीवर शेतमाल खरेदी करण्यात येत असून, त्यासाठी *शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी* करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*👉🏻 मागील महिन्यापासून* शेतकऱ्यांनी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.
*💁♂️ मात्र रब्बी हंगाम* संपूण खरीप हंगाम सुरू होण्याची वेळ आली असली तरी अद्याप जिल्हा केंद्रांना खरेदी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
*💁♀️ यामुळे अद्याप एकाही जिल्ह्यात* खरेदी सुरू झालेली नाही. रब्बी हंगामातील इतर पिकांचे उद्दिष्ट निश्चित झाले नसले तरी रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, एकूण तीन लाख क्विंटल मका खरेदी करण्यात येणार आहे.
*👨🌾 अद्याप खरेदी* सुरू झाले नसल्याने शेतकरी अडचणीत असून, खरीप हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
💥
⚡ *_कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल...!_*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा