पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

KCC:किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? त्याचे फायदे काय?

इमेज
KCC:किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? त्याचे फायदे काय?  किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना आहे, जिचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत करणं हा आहे. केसीसीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिलं जातं. किसान क्रेडिट कार्ड- वैशिष्ट्ये आणि फायदे केसीसी अंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला किती कर्ज द्यायचं, हे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे, त्याच्याकडे जमीन किती आहे आणि त्या जमिनीवर लागवडीखालील क्षेत्र किती आहे, यावरून ठरवलं जातं. केसीसी अंतर्गत शेतकऱ्याला 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिलं जातं, तर त्यापेक्षा अधिक पण 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवणं गरजेचं असतं. केसीसीवरून जे काही कर्ज दिलं जातं त्यावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो. पण, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजे एकूण 4 टक्के व्याजदारानं शेतकऱ्यांना कर्ज मिळतं. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी ...

विदर्भात दिसणार सीडलेस संत्रा - मोसंबी; आता कमी जागेत अन् कमी पाण्यात येणार उत्पन्न

इमेज
विदर्भात दिसणार सीडलेस संत्रा - मोसंबी; आता कमी जागेत अन् कमी पाण्यात येणार उत्पन्न देशात लिंबूवर्गीय फळपिकांची लागवड वाढली आहे. या फळांच्या निर्यातीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातून दरवर्षी साधरण ८० ते ९० हजार टन लिंबूवर्गीय फळपिकांची निर्यात होते. दरम्यान संत्रा मोसंबीची फळ पिकांचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. कारण नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्यांच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या असून या प्रजाती सर्व सीडलेस आहेत. येत्या चार ते पाच वर्षात विदर्भातील बाजारपेठेत ही फळे दिसणार असून अधिक उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी व्यक्त केला. याविषयी बोलताना लदानिया म्हणाले की, मागील पाच ते सहा वर्षांपासून संस्थेच्या फार्मवर या प्रजातींचे रोपण करुन त्यांचे संशोधन सुरू होते. या सहा वर्षाच्या प्रयत्नांना यश आलेल्याचे लदानिया म्हणाले. या विषयीची माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. पुढील वर्षापासून या सहा प्रजातींच्या कलमे शेतकऱ्यांना उपलब्ध करु...

सोयाबीन काढणीला आल्यावरच त्याचे भाव का पडतात? -

इमेज
सोयाबीन काढणीला आल्यावरच त्याचे भाव का पडतात?  सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याची चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून सुरू आहे. सोयाबीनच्या दराच्या पावत्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचं पीक मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला नेमका किती दर मिळणार, दरवर्षी सोयाबीन मार्केटला आल्यावरच त्याचे दर का उतरतात, असा प्रश्न शेतकरी विचारताना दिसून येत आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या दराचं नेमकं प्रकरण काय आहे, सरकारनं सोयापेंड आयात करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे सोयाबीनच्या दरावर काय परिमाण होतील, याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. सोयाबीनचा भाव दरवर्षी पडतो, कारण... आमच्या शेतात सोयाबीन होती तेव्हा सोयाबीनला चांगला भाव होता. पण, ती काढणीला आली तर भाव उतरतो. आमचं पीक मार्केटला न्यायची वेळ आली की भाव उतरतो, अशी तक्रार शेतकरी करत आहेत. त्यामुळे मग काढणीला आल्यावरच सोयाबीनचा भाव का उतरतो, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला. कृषीतज्ञ शरद निंबाळकर यांच्या मते, "सोयाबीनचं पीक म...

पिकांना उपयुक्त असे व्हर्मिवॉश अशा पद्धतीने बनवा घरच्या घरी

इमेज
पिकांना उपयुक्त असे व्हर्मिवॉश अशा पद्धतीने बनवा घरच्या घरी सध्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत आहे.त्याचा अनिष्ट परिणाम हा जमिनीवर होताना दिसत आहे. त्यामुळे आता बर्याचश्या शेतकऱ्यांचा कल आता सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहे. आपल्याला माहिती आहेच की सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळाला फार महत्व आहे. उपयुक्त अशा गांडूळ पासून वर्मी कंपोस्ट आणि वर्मी वाश असे दोन उपयुक्त घटक मिळतात.वर्मी कंपोस्‍ट हे गांडूळाच्या विष्टे पासून मिळते. गांडूळाचे महत्त्वाचे एक वैशिष्ट्य आहे की, गांडूळ आने खाल्लेल्या सेंद्रिय घटकांपैकी आपल्या पोषणासाठी केवळ दहा टक्के भाग वापरतो. बाकीचा भाग विष्टे द्वारे शरीराबाहेर टाकतो.त्यालाच आपण वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत असे म्हणतात.गांडूळ यापासूनच वर्मी वाश देखील मिळते.यामध्ये मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून उत्पादकता वाढते.   वर्मी वाश तयार करण्याची पद्धत  साहित्य एक लहान आकाराचा एक मोठ्या आकाराचा मातीचा माठ, माठ ठेवण्यासाठी एक तीपाई आवश्यक, अर्धवट कुजलेले शेणख...

जर शेतजमीन खरेदी विक्री करीत असाल तर जाणून त्यासंबंधीतील काही बदल

इमेज
जर शेतजमीन खरेदी विक्री करीत असाल तर जाणून त्यासंबंधीतील काही बदल जमिनीच्या किमती काही वर्षांपासून गगनाला भिडले आहेत.म्हणूनच त्या अनुषंगाने जमीनचेतुकडे करून खरेदी-विक्रीचे व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अगदी दोन तीन गुंठे जमीनीची देखील खरेदी विक्री केली जात आहे. जर महसूल अधिनियमाचा विचार केला तर तुकडे बंदी लागू आहे.  असे असताना अशा प्रकारचे व्यवहार सर्रासपणे चालू होते तसेच त्यांची दस्त नोंदणी होत होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले होते.त्यानुसार या विभागाने एक आदेश जारी केला आहे. या सगळ्या आदेशा विषयीची माहिती या लेखात घेऊ.   जमिनीच्या खरेदी विक्री संबंधातील नवीन नियम जर तुम्ही एखादा गटनंबर मधील दोन एकर क्षेत्र आहे आणि त्यातून जर एक किंवा तीन गुंठ्यांत जागा विकत घेणार असेल तर त्याची दस्तनोंदणी आता होणार नाही. याचा अर्थ तुम्ही ती जमीन विकत घेतली तरी सुद्धा ती तुमच्या नावावर होणार नाही.परंतु यामध्ये त्या सर्वे नंबरचालेआऊट करून त्यामध्ये एक किंवा दोन गुंठ्याचे तुकडे पाडून त्यात जिल्हाधिकारी व सक्ष...

युरियाला पर्याय म्हणून वापरा रायझोबियम

इमेज
युरियाला पर्याय म्हणून वापरा रायझोबियम                              २५ एकर क्षेत्राला जिवाणू खत वापरणे ते ही पीक वाढीचा अवस्थेत असताना थोडे अवघड जाते. आम्ही त्यांना रायझोबियम चा व्यतिरिक्त पी. एस.बी(स्फुरद विरघवणारे जिवाणू) आणि के.एम.बी(पालाश उपलब्ध करणारे जिवाणू) हे ही वापरण्यास दिले. ह्याचा वापर होण्यासाठी आम्ही १टन लाकडी भुस्याचा वापर केला आणि हे सर्व जिवाणू हे त्या लाकडी भुस्यमध्ये मिसळले. हा भुस्सा आम्ही त्यांचा २५ एकर क्षेत्रावर विस्कटुन घेतला. ऐन पावसात आम्ही ते खत विस्कटुन घेतले जेणेकरून जिवाणूंचे परिणाम लवकर मिळतील. जिवाणूंचा परिणाम हे १०दिवसानंतर जाणवू लागला. झाडांची वाढ आणि काळोखी ह्या दोन्ही घटकांमध्ये सुधारणा झाली होती. पानाचा काळोखी मध्ये वृद्धी ह्याचा अर्थ पानांची प्रकाशसंश्लेषण करण्याची क्षमता ही वाढली. जेवढं जास्त प्रकाशसंश्लेषण होणार तेवढी जास्त साखर खोडामध्ये साठणार. जेवढी जास्त साखर खोडामध्ये साठणार तेवढं चांगले दाणे भरणार आणि उत्पादन वाढणार. ह्या सगळ्याच फायदा असा झाला की शेतकरी ज...

ड्रोनचा वापर करून शेतकरी शेतीमध्ये काढू शकतात अधिक उत्पन्न; ते कसे?

इमेज
ड्रोनचा वापर करून शेतकरी शेतीमध्ये काढू शकतात अधिक उत्पन्न; ते कसे? ड्रोन (Drones) प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कशी मदत आणि लाभ देऊ शकतात? जर शेतकऱ्यांनी ड्रोन (Farmers drones) आणि तंत्रज्ञान (Technology) स्वीकारले तर त्याचा वापर आणि फायदे काय आहेत याविषयी सविस्तर माहिती घेऊया.. पीक देखरेख – या अंतर्गत, शेतकऱ्यांना (farmers) त्यांच्या पिकांचे (crops) सतत निरीक्षण करण्याचा आणि त्यांच्या सोयीनुसार पाळत ठेवण्याचा पर्याय आहे. पीक संरक्षण – ड्रोन (Drones) वापरून पिकांचेही संरक्षण (Protection) करता येते. कीटकनाशकांची योग्य वेळी योग्य प्रमाणात फवारणी केल्यास उत्पादनाचे (production) प्रमाण सुधारू शकते कारण कमीत कमी अपव्यय आणि जास्तीत जास्त उत्पादन (production) होते. उत्पादकतेत वाढ – ड्रोन वापरणारे शेतकरी (Farmers) त्यांची एकरी उत्पादकता (Productivity) वाढवू शकतात कारण ते एक उदाहरण देण्यासाठी कीटकनाशके किंवा खते फवारणीसाठी कमी श्रम वापरतात. देखरेख आणि संरक्षणासाठी (protection) ड्रोन वापरून मॅन्युअल पाळत ठेवणे देखील दूर केले जाऊ शकते. पिकांची लागवड – पूर्वी शेतकऱ्यांनी केलेली झाडे आणि ...

शेतातील "मित्रकिटक" रोग - किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायकारक.....

इमेज
  शेतातील "मित्रकिटक" रोग - किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायकारक.....  हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहून त्यांना ते हळूहळू खातात व मारतात. यातील काही कीटक असे. जैविक नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक– 1)ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकाच्या अनेक प्रजाती नुकसानकारक किडींचे जैविक नियंत्रण करताना आढळतात. त्यापैकी ट्रायकोग्रामा चिलोनीस ही प्रजाती जैविक नियंत्रणातील एक मुख्य उदाहरण आहे. या परोपजीवी कीटकांचा उपयोग ऊस, भात, मका व ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंड अळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, डाळिंबावरील सुरसा, कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग आदी किडींच्या नियंत्रणासाठी होतो.प्रसारण मात्रा - एका ट्रायकोकार्डवर सुमारे 20 हजार परोपजीवीयुक्त अंडी असतात. अशा ट्रायकोकार्डसचे पाच ते 10 प्रति हेक्टर या प्रमाणात तर प्रौढांचे 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर याप्रमाणे प्रसारण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार आठवड्याच्या अंतराने चार ते पाच प्रसारणे करावीत. 2) एनकार्शिया हे कीटक भाजीपाला, फळ...

वाटाणा लागवडीचे तंत्रज्ञान

इमेज
वाटाणा लागवडीचे तंत्रज्ञान नुकत्याच झालेल्या पावसाने रब्बी हंगामाची पाण्याची चिंता काही प्रमाणात दुर झाली. रब्बी हंगामातील लागवडीच्या पुर्वनियोजनाचा कालावधी आता सुरु झाला आहे. रब्बी हंगामात उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात वाटाणा हे एक महत्वाचे पिक आहे. वर्षभर असणारी मागणी आणि चांगला भाव असे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. हे पिक कडधान्य वर्गातील असले तरी भाजी म्हणुनच ह्या पिकाला घरांसोबत हॉटेल्समध्येही भरपुर मागणी असते. हे पीक जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करते, त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते. भारतात वाटाण्याची लागवड प्राचीन काळापासून होत आहे. बडोदे, खानदेश, नगर, नाशिक, पुणे, सातारा या ठिकाणी वाटाण्याची लागवड केली जाते. हवामान व जमीन सरासरी तापमान १० ते १८ सेल्सिअस असल्यास पिकाची वाढ चांगली होते. वाटाणा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरी हलक्या जमिनीत पीक लवकर तयार होते. तर मध्यम भारी पण भुसभुशीत जमिनीत पीक तयार होण्यास जास्त कालावधी लागतो. मात्र या जमिनीत उत्पादन चांगले मिळते. वाटाण्याच्या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत, कसदार, रेतीमिश्रित आणि ५.५ ते ६.७ सामू ...

कोरडवाहू फळ पिकांसाठी मटका सिंचन

इमेज
  कोरडवाहू फळ पिकांसाठी मटका सिंचन महाराष्ट्रात रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फळबाग अभियान यातून फळपिकांची विक्रमी लागवड झाली आणि महराष्ट्राचा फळ उत्पादनाचा टक्का वाढला परंतु आजची स्थिती पहिली तर लहरी हवामान कधी दुष्काळ तर कधी गारपीठ, रोग प्रतिकारक व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींसाठी संशोधनाची गरज असे अनेक फळबाग लागवडीपूर्व प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत तरीही शेतकरी न डगमगता त्या प्रश्नांचा सामना करतो आहे. महाराष्ट्रात कोरडवाहू तसेच बागायती फळ पिकाखालील लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसते आहे, दिवसेंदिवस वाढते तापमान मानवी आरोग्य बरोबर पक्षी, प्राणी व इतर जीव त्याचबरोबर पिकांसाठी धोक्याची घंटा वाजवित आहे. या काळात फळ पिकात बहार नियोजन करणे दूरची गोष्ट फळपिकां खालील क्षेत्र वाचविणे मोठ्या जिकीरीचे झाले आहे यावर उपाय म्हणून ठिबक सिंचनातून पाण्याची कमालीची बचत होते आहे परंतु आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व शेतकऱ्यास हे शक्य नाही अशा परीस्थितीत कमी भांडवलात आधुनिक ठिबक सिंचनाचे फायदे देणारे सोपे तंत्र मटका सिंचन नक्कीच फायद्याचे ठरेल. सूर्यप्रकाश हा झाडाच्या वाढीस महत्वाचा घटक आहे परंतु प...

सातबारा उतारा कधीपासून मोफत मिळणार? काय झालेत नेमके बदल?

इमेज
सातबारा उतारा कधीपासून मोफत मिळणार? काय झालेत नेमके बदल? शेतकऱ्यांना डिजिटल सहीच्या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत मोफत आणि घरपोच देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. यासाठी महात्मा गांधी जयंतीपासून म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून महसूल विभाग विशेष मोहीम हाती घेणार आहे. गावपातळीवर तलाठी आणि कोतवाल यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय 1 सप्टेंबर 2021 रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, सुधारित सातबारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जो खर्च येईल, तो जिल्हा सेतू समितीकडील निधीमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्याची सुधारित प्रत एका खातेदारास फक्त एकदाच मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुधारित सातबारा असा असेल... महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात प्रमुख 11 बदल केले आहेत. जवळपास 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात बदल करण्यात आले आहेत. हा सुधारित सातबारा उतारा महसूल दिनापासून (1 ऑगस्ट 2021) सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. सातबारा उताऱ्यातील गाव नमुना-7 मध्ये कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे, याच...

उत्पादनवाढीसाठी जिवाणू खतांचा वापर

इमेज
उत्पादनवाढीसाठी जिवाणू खतांचा वापर  पिकांसाठी आवश्यक नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या उपलब्धतेसाठी जैविक खते उपयुक्त ठरतात. या खतांचा वापर योग्य प्रकारे केल्यास जमिनीची सुपीकता वाढून पिकांच्या उत्पादनामध्ये १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होते. काही जिवाणू हवेतील नायट्रोजन (नत्र) शोषून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. या जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून, त्यापासून खते तयार केली जातात. अलीकडे जमिनीतून स्फुरद, पालाश, झिंक व लोह इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता करणारी जिवाणू खतेही उपलब्ध झाली आहेत.  शेंगावर्गीय पिके आणि भुईमूग बियाण्यास रायझोबियम अधिक पी.एस.बी. ही जिवाणू खते प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात पेरणीआधी बीजप्रक्रिया करावी.गहू, ज्वारी, मका या पिकांच्या पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्‍टर + पी.एस.बी. प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. उत्तम परिणाम मिळविण्यासाठी 1) बाजारातून जिवाणू खते आणताना, त्यात उपयुक्त जिवाणू प्रजाती व संख्या असल्याची खात्री करावी. २) खात्रीलायक ठिकाणावरूनच खरेदी करावी, अन्यथा भेसळीची...

अन्नद्रव्यांतून रोगप्रतिकारक्षमता

इमेज
अन्नद्रव्यांतून रोगप्रतिकारक्षमता वनस्पतींच्या जैविक प्रक्रियांसाठी संतुलित अन्नद्रव्यांची आवश्‍यकता असते. त्यातील काही घटकांची कमतरता झाल्यास वनस्पतींमध्ये रोगांच्या शिरकावासाठी अनुकूल स्थिती तयार होते. हे टाळण्यासाठी, पिकांची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी अन्नद्रव्यांचा संतुलित वापर आवश्‍यक आहे.  पिकामध्ये रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या अांतरभागामध्ये एखादा अपायकारक घटक (जिवाणू, बुरशी किंवा विषाणू) प्रवेश करतो. तो पिकाच्या शरीरक्रियेमध्ये (विविध जैव रासायनिक प्रक्रियांत) बदल घडवून आणतो. त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण, वहन आणि उपयोग या क्रियांवर अनिष्ट परिणाम होतो. त्याची लक्षणे बाहेरून विविध मार्गांनी दिसतात. सामान्यपणे, पिकांमध्ये अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाण असताना कीड व रोगांना अधिक प्रतिकारक क्षमता असते. या अन्नद्रव्यांच्या प्रमाणातील बदलामुळे पीक रोगांस संवदेनशील होते. संतुलित प्रमाणात पीकपोषण केल्याने पिकांत दोन पद्धतींनी (उपायांमुळे) रोगप्रतिकारक क्षमता वाढवता येते. १. पिकांतील पेशी भित्तिकांचा विकास करून त्यांची जाडी वाढवणे. यामुळे अपायकारक घटकांचा शिरकाव रोखता येईल....

कीटकनाशके फवारण्याची सकारात्मक व नकारात्मक परिणाम

इमेज
कीटकनाशके फवारण्याची सकारात्मक व नकारात्मक परिणाम शेती करणं बोलणं सोपं वाटतं, पण शेतीतील एक उत्पन्न घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पेरणीनंतर लागवड, त्यानंतर पिकांची देखभाल म्हणजेच कीड व्यवस्थापन, मग कापणी त्यानंतर आपल्याला पीक मिळत असते. पण अधिक चांगले आणि अधिक उत्पन्न हवे असेल तर आपल्याला कीड व्यवस्थपानावर लक्ष्य देणं आवश्यक असते. किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी आवश्यक असते. परंतु या फवारणीचे काही सकारात्मक काही नकारात्मक परिणाम असतात. त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.. कीटकनाशके फवारण्याची सकारात्मक 1)पिकावर रस शोषणाऱ्या किडींसाठी १५ ते २० टक्के झाडांवर खोडकिडी बोंड अळ्या आणि पाने गुंडाळणाऱ्या व खाणाऱ्या अळ्या यांचा उपद्रव पाच टक्के व त्यापुढे असल्यास रासायनिक कीटकनाशक फवारावे अन्यथा जैविक कीटकनाशकांचा वापर करावा. २)शेतकऱ्यांनी शेतीसाठी कीटकनाशक आवरून सुमारे ८ रुपये खर्च केल्यास त्याला जवळपास ४० रुपये इतका फायदा होतो. ३)मावा व तुडतुडे या किडी वनस्पतीच्या पानाच्या मागील बाजूस राहत असल्यामुळे कीटकनाशकांची फवारणी पानाचे मागील बाजूस करावी. त्याचप्रमाणे भात व ज...

सुर्यफुल लागवड पद्धत, माहित करून घ्या

इमेज
सुर्यफुल लागवड पद्धत, माहित करून घ्या जमीन – सूर्यफुल लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पूर्वमशागत – जमीनीची खोल नांगरट करुन त्यानंतर कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत घालावे. पेरणी हंगाम – खरीप – जुलै पहिला पंधरवडा, रब्बी – ऑक्टोंबर पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा उन्हाळी – फेब्रुवारी पहिला पंधरवडा. पेरणीचे अंतर – मध्यम ते खोल जमीन – ४५ X ३० सें.मी., भारी जमीन – ६० X ३० सें.मी. तसेच संकरित वाण आणि जास्त कालावधीच्या वाणाची लागवड ६० X ३० सें.मी. अंतरावर करावी. पेरणी पध्दत – कोरडवाहू सुर्यफूलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. बियाणे ५ सें.मी पेक्षा जास्त खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड सरी वरंब्यावर टोकण पद्घतीने करावी. बियाणे - सुर्यफूलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणाचे ८-१० किलो बियाणे आणि संकरित वाणाचे ५ ते ६ किलो बियाणे प्रति हेक्टर...

ट्रायकोग्रामा ः परोपजीवी मित्र कीटक

इमेज
  ट्रायकोग्रामा ः परोपजीवी मित्र कीटक ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक शेतामध्ये सोडले जातात. ते पतंगवर्गीय हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. ही अंडी १६ ते २४ तासांत उबतात. अंड्यातून निघालेली ही ट्रायकोग्रामाची अळी यजमान किडींच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाऊन ३ ते ४ दिवस कोषावस्थेत जाते.   ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक शेतामध्ये सोडले जातात. ते पतंगवर्गीय हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. ही अंडी १६ ते २४ तासांत उबतात. अंड्यातून निघालेली ही ट्रायकोग्रामाची अळी यजमान किडींच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाऊन ३ ते ४ दिवस कोषावस्थेत जाते. निसर्गामध्ये सजीवांची अन्नसाखळी असते. “जीवो जीवस्य जीवनम्” म्हणजेच एक जीव दुसऱ्या जिवाला खातो. हे परोपजीवी, परभक्षी आणि सूक्ष्म जीव हे सतत निसर्गामध्ये कार्यरत असल्यामुळे अनेक हानिकारक किडींच्या उद्रेकाला अटकाव होण्यास मदत होते. त्यातील परोपजीवी मित्र कीटकांपैकी ट्रायकोग्रामा हा एक महत्त्वाचा मित्रकीटक आहे. तो हानिकारक किडींच्या बंदोबस्तासाठी भारत व इतर देशांत सरस ठरला आहे.   ट्रायकोग्रामाची ओळख  ट्रायकोग्रा...

गवार लागवड माहिती

इमेज
गवार लागवड माहिती ● लागवड हंगाम गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगमास गवारीची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. बियांचे प्रमाण हेक्टरी १४ ते २४ किलो बी लागवडीस पुरेसे असते. बियाण्यास पेरणीपूर्व १० ते १५ किलो बियाण्यात २५० ग्रॅम रायझोबियम चीलावे. ● पूर्वमशागत जमिनीची प्रत व हवामानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी ठेवावे आणि झाडातील अंतर २० ते ३० सेंमी ठेवावे. काही शेतकरी ४५ सेंमी पाभारणे बी पेरून नंतर सारा यंत्राने सारे पडतात किंवा ४५ X ६० सेंमी अंतरावर स-या पडून सरीच्या दोन्ही बाजून दोन झाडातील अंतर १५ ते २० सेंमी राहील या अंतरावर दोन दोन बिया टोकतात. ● खते व पाणी व्यावस्थापन गवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पिक घेतल्यास त्यास खताची फारशी जरुरी भासत नाही. बागायती पिकास लागवडीपूर्वी ५० किलो नत्र, ६० किलो पालाश द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे. या पिकला पाणी माफक प्रमाणत लागते परंतु फुले आल्यापासून शेंगाचा बहार पुरण होइपर्यत नियमित पाणी द्यावे. ● आंतरमशागत पेरणीनंतर १० ते २० दिवसांनी रोपांची विरळणीकरून जोम...