पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फायद्याची फणस शेती

इमेज
फायद्याची फणस शेती फणस हे नगदी पीक म्हणून फायदेशीर ठरू शकते. दक्षिणेकडील राज्यांतील फणस शेती पाहिल्यास याची साक्ष पटू शकते. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये या फळाला फार वरचे स्थान आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत फणसाचे विविध पदार्थ विकून आणि निर्यात करून चांगली कमाई केली जात आहे. मोठय़ा प्रमाणावर फणस लागवड झाल्यास कोकणात त्यावर मोठा प्रक्रिया उद्योग उभा राहू शकेल. हवामान व जमीन : या वृक्षाला थंड हवामान आणि तीव्र उन्हाळा सोसत नाही, पण उष्ण-दमट हवामान आणि मध्यम पाऊस असणाऱ्या भागात त्याची चांगली वाढ होऊ शकते. लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर करता येते. पण खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत वाढ चांगली होते. काळ्या चिकण मातीत फळे उशिरा आणि कमी धरतात. समुद्रसपाटीपासून १६०० मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये हा वृक्ष वाढू शकतो. पण १२०० मीटर उंचीवरच्या भागातील फळे कमी दर्जाची असतात. फणसाच्या जाती : फणसाच्या फळांचे कापा आणि बरका (रसाळ) हे दोन मुख्य प्रकार पडतात. कापा आणि बरका याप्रमाणेच विलायती फणस हीसुद्धा एक जात आहे. कापा जातिचे फणस हा बरक्या फणसापेक्षा कमी गोड आणि रसाळ असतो....

शेतात कोळपणी करणे म्हणजे काय? जाणून घ्या कोळपणी करण्याचे फायदे व प्रकार..

इमेज
शेतात कोळपणी करणे म्हणजे काय? जाणून घ्या कोळपणी करण्याचे फायदे व प्रकार.. भारतीय शेती पद्धतीची (Indian Agriculture)परंपरा फार पुरातन आहे. प्राचीन काळापासूनच निरनिराळ्या शेती पद्धतींचा अवलंब केला जात आहे. (Weather) हवामान, जमिनीचा प्रकार (Types of soil )इ. गोष्टी लक्षात घेता भारतीय शेती नैसर्गिक रीत्या विविध भागांत विभागली गेली आहे. या कारणामुळेच प्रत्येक विभागातील शेती अवजारांची बनावट आवश्यकतेनुसार निरनिराळी आहे. Secondary Tillage भारतात दरवर्षीच पिकातील तण नियंत्रणासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतात पेरणी झाल्यानंतर तीन, सहा, किंवा नऊ आठवड्यांनी कोळपे या अवजाराच्या सहाय्याने शेतीची कोळपणी करतात. प्रत्येक शेतीची सुरूवातीची पिकांची वाढ संथ गतीने होत असते. त्यामुळे पिकाव्यातिरिक्त तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो. तसेच पेरणी नंतर सुरुवातीच्या दोन तीन आठवड्याच्या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते, यासाठी कोळपणी करणे हिताचे मानले जाते कोळपणीचे फायदे : • कमीत कमी खर्चात व वेळत तण निंयञण होते. • जमिनीत हवा खेळती राहते तसेच उत्पादनात देखील वा...

जाणून घ्या वेस्ट डिकंपोजर विषयी महत्वाच्या बाबी ओळख, वापर, बनविण्याच्या पद्धती, फायदे

इमेज
जाणून घ्या वेस्ट डिकंपोजर विषयी महत्वाच्या बाबी ओळख, वापर, बनविण्याच्या पद्धती, फायदे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. गायीच्या शेणातील जिवाणू पासुन तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामधे पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनिच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो.It can be used in various ways for soil fertility, crop growth and protection.ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे. साहित्य - वेस्ट डि कंपोजर २ किलो गुळ२०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)२०० ल...

चुकून तणनाशक फवारले गेले तर काळजी करू नका करा फक्त हे सोप्पे उपाय

इमेज
चुकून तणनाशक फवारले गेले तर काळजी करू नका करा फक्त हे सोप्पे उपाय कोणत्याही पिकावर चुकून आंतरप्रवाही तणनाशक मारले गेले असल्यास ,त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो स्पर्षजन्न तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते.मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, 15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी(डायअमोनियम फॉस्फेट ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . टीप- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे.गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी करा Spray solution of jaggery and DAP on affected crop 4 times at 7/7 hour interval.केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो.बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2...