पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संत्रा

इमेज
संत्रा ‍ प्रस्तावना महाराष्ट्रातील संत्र्याची नागपूर संत्रा ही जात अप्रतिम चवीमुळे जगप्रसिद्ध आहे. मुख्यत्वेकरून विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सुद्धा संत्र्याची लागवड करण्यास वाव आहे. हवामान संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे. या तापमानाच्या कक्षेत उत्तमरित्या होते. या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान, ३७० मि. मी. पाऊस आणि ५० ते ५३ टक्के हवेतील आद्रता चांगली मानवून झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते. जमीन मध्यम काळी १ ते १.५ मीटर खोलीची जमीन, त्याखाली पाण्याचा निचरा होईल असा मातीमिश्रित मुरूम अथवा थोडी चुनखडी किंवा वाळूमिश्रित मातीचा थर असलेली व ज्या जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक ५.५ ते ७.५ च्या दरम्यान असतो. अशी जमिनी लागवडीस उत्तम समजली जाते. भारी काळ्या जमिनी, ज्यात काळी माती १.५ ते ३.५ मीटर खोल असून खाली चोपण मातीचा थर असतो तेथे पाणी जास्त प्रमाणात धरून ठेवण्याची क्षमता असल्याने झाडाच्या मुळ्या सडून पुढे झाडे वाळतात. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत संत्र लागवड करू नये. पूर्वमशागत संत्र्याची बाग लावण्याकरिता जमिनीच...

पीकपोषणात कॅल्शिअमचे महत्त्व

इमेज
पीकपोषणात कॅल्शिअमचे महत्त्व कॅल्शिअम हे नत्र, स्फुरद व पालाश अन्नद्रव्याप्रमाणेच पीक पोषणात महत्त्वाचे असे दुय्यम अन्नद्रव्य आहे. त्याच्या वापरासंदर्भात माहिती जाऊन घेणे आवश्‍यक असून, त्याचा डोळसपणे वापर केल्यास पीकपोषण चांगल्या प्रकारे होईल.   कॅल्शियम पिकांच्या महत्त्वाच्या शरीरक्रियांमध्ये महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. त्याचप्रमाणे नत्रयुक्त खतांचा (युरिया) कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी विद्राव्य कॅल्शियममुळे मदत होते. त्यामुळेच खताद्वारे पिकांना कॅल्शियम देणे गरजेचे असते. (उदा. कॅल्शियम नायट्रेट) मात्र पिकांना कॅल्शियमचा पुरवठा हा कमतरतेची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आल्यानंतर केला जातो. कॅल्शियमची जमिनीतील उपलब्धता - - निसर्गात कॅल्शिअम सुमारे ३.६ टक्के असून, तो ॲम्फीबोल, ॲपेटाइट, कॅलसाइट, डोलोमाइट, फेल्डस्पार, जिप्सम आणि पायरॉक्सिन यासारख्या स्वरूपामध्ये आढळतो. जमिनीमध्ये चुना किंवा कॅल्शियम कार्बोनेट निसर्गतः आढळणारे संयुग आहे. जमिनीत कॅल्शियम साधे क्षार, विद्राव्य स्वरूपात व विनिमययुक्त कॅल्शियम इत्यादी स्वरूपात उपलब्ध असते.  - जमिनीत कॅल्शियम (Ca++) हे रासायन...

मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे, यंत्रे

इमेज
मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे, यंत्रे भारतातही मधमाशी पालन व्यवसायामध्ये वाढ होत आहे. मधमाश्या पालनाचे यश पूर्णपणे मधमाशी वसाहतींची देखभाल, शास्त्रीय पद्धतीने केलेले व्यवस्थापन या प्रमाणेच त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमाणित पेट्या, यंत्रे, उपकरणे आणि अवजारे यावर अवलंबून असते. मधमाशांच्या वसाहती विशिष्ठ प्रकारच्या पेट्यांमध्ये ठेवून त्यांचे पालन, पोषण आणि व्यवस्थापन केले जाते, त्यास आधुनिक मधमाशी पालन असे म्हणतात. मधमाशी पालन तंत्राचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतल्यास चांगले मध उत्पादन व इतर उत्पादने घेता येतात. मधमाशी पालन व्यवसाय हा कृषी आधारित फायदेशीर व्यवसाय आहे. मधमाशी वसाहतींच्या देखभाल, व्यवस्थापनासाठी प्रमाणित पेट्या, यंत्रे, उपकरणे आणि अवजारे यांची माहिती या लेखात घेऊ. भारतीय मधूपेटी निसर्गात मधमाश्या आडोशाच्या जागी, झाडांच्या ढोलीत समांतर पद्धतीने आपले मेणाचे पोळे बांधतात. त्यात मध, पराग, अंडी इ. साठवून ठेवतात. मधमाश्या कधीही एकट्या - दुकट्या नसतात. त्या कायम समूहातच वसाहत करून राहतात. एका वसाहतीत साधारणपणे १० ते ३५ हजार मधमाश्या असतात. त्यांची प्...

पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठीचे उपाय कोणते?

इमेज
  शेती : पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठीचे उपाय कोणते?     पेरणी झाली, पण पाऊसच नाहीये. आधी बरा पाऊस झाला, त्यामुळे पेरणी केली. पण आता 8 दिवसापासून पाऊस नाही," असं माझे वडील मला सांगत होते . ही काही फक्त माझ्या वडिलांची एकट्याची गोष्ट नाहीये, तर महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांसमोर आज दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे. कारण सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसानं आता मात्र दडी मारली आहे. त्यामुळे पेरणीची योग्य वेळ कोणती? दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काय करायला हवं? यासाठीचे काही शास्त्रीय निकष आहेत का? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. कृषी विभागाचा सल्ला सुरुवातीला महाराष्ट्राच्या कृषी विभागानं शेतकऱ्यांना जो सल्ला दिलाय, तो जाणून घेऊया. जोपर्यंत तुमच्या भागात 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नका, असं आवाहन महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय, "राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जूनपर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्य...

मिरची लागवड तंत्रज्ञान

इमेज
मिरची लागवड तंत्रज्ञान नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण मिरची पिका बद्दल या लेखात माहिती करून घेणार आहोत. मिरचीही आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याबरोबर ते एक उत्तम व्यापारी पीक आहे. भारतीय हवामानात मिरची हे पीक उत्तमरीत्या वाढते. आपल्या देशातील मिरचीची परदेशात निर्यात केली जाते. मिरची निर्यातीमध्ये आपला जगात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्र मधील मिरची लागवडीखालील एक लाख 40 हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड,धुळे, चंद्रपूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, आणि अमरावती या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात मिरचीचे अनेक स्थानिक प्रकार आढळतात. उदाहरणार्थ लवंगी, संकेश्वरी, (कोल्हापूर) , वाल्हा( पुणे), मुसळवाडी( अहमदनगर ),देगलूर, धमीबादी (नांदेड), दोंडाईचा (धुळे) ,मलकापूर,(बुलढाणा) भिवापुरी (नागपुर )इत्यादी. हिरव्या मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अ व क जीवनसत्व असतात.मिरची मध्ये असलेल्या कॅपसीन या रासायनिक द्रव्यामुळे मिरचीला तिखटपणा येतो. तर सुकलेल्या मिरच्यांना कॅपसीन या रंगद्रव्यामुळे लाल रंग येतो. मिरचीच्या भुक्तिमध्ये जास्तीत जास्त 1.5 टक्के तिखटपणा असतो. ...

पॉलिसेल्फेटः शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे नैसर्गिक खत

इमेज
पॉलिसेल्फेटः शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे नैसर्गिक खत पॉलीसल्फेट हे आयसीएल(ICL) द्वारे युकेमध्ये बनविण्यात आलेले बहु-पोषक नैसर्गिक खत आहे. हे एक नैसर्गिक खनिज (डायहाइड्रेट पॉलिहालाईट) आहे. ज्यामध्ये चार प्रमुख पोषक घटक, पोटॅशिअम, सल्फर, कॅल्शिअम आण मॅग्नेशिअम आहेत हे एक नैसर्गिक क्रिस्टल असल्याने पाण्यात हळूहळू विरघळते आणि मातीत आपले पोषक तत्व हळू-हळू सोडत असते. पॉलीसल्फेटची ही विशेषता आहे की, पीक चक्राच्या दरम्यान पोषक उपलब्धता दीर्घकाळासाठी राहत असते. तर इतर पारंपारिक पोटॅश, आणि सल्फेट खतांमधील पोषक द्रव्ये पिकांच्या थोड्याच काळासाठी उपलब्ध असतात. पॉलीसल्फेट (पॉलीहॅलाइट) द्वारे तत्वाचं दीर्घ रिलीज पॅटर्न जास्त पाऊस झाल्यानंतरही गळतीमुळे होणारे पोषक तत्वांचे नुकसान खूप कमी करत असते. पॉलीसल्फेटचे हे वैशिष्टये हे आहे की, शेतीच्या सर्व परिस्थितीमध्ये हे सर्वात उपयुक्त खत बनवतं. MgO 5.5% CaO 16.5% पॉलीसल्फेट सर्व पिकांसाठी आहे उपयुक्त: शेतकऱ्यांसाठी हे कमी उत्पादन खर्चात अधिक सुविधाजनक आणि प्रभावी खत आहे. जे एकासह एकाच खतातून पिकांना चार वेगवेगळ्या आवश्यक पोषक घटक पुरवते. पॉलीसल...

इस्राईलने कमी जागेत जास्त उत्पन्नासाठी एक शक्कल शोधून काढलीये

इमेज
इस्राईलने कमी जागेत जास्त उत्पन्नासाठी एक शक्कल शोधून काढलीये शेती क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग सुरु असतात. विशेषत: इस्राईलसारख्या देशात जिथे शेतजमिनीची कमतरता असते, तिथे शेतीसाठी विविध पर्याय अवलंबले जातात. आजच्या काळात संपूर्ण लोकसंख्येला मुबलक अन्नधान्य पुरवठा करणे ही नेहमीच एक आव्हानात्मक समस्या राहिली आहे. शेतीसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा काळात या नव्या तंत्रज्ञानाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष बाब म्हणजे या शेतीसाठी तुमच्याकडे जमीन असलीच पाहिजे अशी अट नाही. सध्या सगळीकडेच शेतजमिनींची कमतरता जाणवत आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घराच्या भिंतीवरही शेती केली जाऊ शकते. इस्राईलमध्ये हे तंत्रज्ञान सध्या जास्त लोकप्रिय झालेले आढळते. इस्राइलमधील अधिकाधिक लोक याप्रकारच्या शेतीचा अवलंब करत आहेत. इस्राईलमध्ये शेती योग्य जमिनीची कमतरता असल्याने तिथे व्हर्टीकल फार्मिंगची पद्धती मोठ्या प्रमाणात अवलंबली जात आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि शेतजमिनीची कमतरता, यावर ही शेती पद्धती जास्त प्रभावकारी ठरू शकते. दाट लोकसंख्येच्या शहरात जिथे शेत जमीन खूप दूर ...

जिप्सम म्हणजे काय? जाणून घ्या काय होतो याचा फायदा

इमेज
जिप्सम म्हणजे काय? जाणून घ्या काय होतो याचा फायदा जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते. जिप्सममुळे खालील फायदे होतात. 1.जिप्सममुळे जमिनीची सुपीकता वाढवते. 2.जमीन भुसभुशीत होते. 3.जमिनीची रचना बदलण्यास मदत होते. 4.क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते. 5.बियाण्याची उगवण चांगली होते. 6.पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात. ं 7.जमिनीची धूप कमी होते. 8.पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही. 9.जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते. 10.सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. 11.जिप्सममुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते. 12.जिप्सममुळे फळांची गुणवत्ता सुधारते. 13.भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. 14.जिप्सम मुळ...

हिमाचल प्रदेश मधील शेतकऱ्यांकडून ॲमेझॉन खरेदी करेल फळे आणि भाजीपाला

इमेज
हिमाचल प्रदेश मधील शेतकऱ्यांकडून ॲमेझॉन खरेदी करेल फळे आणि भाजीपाला बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन लवकरच हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील शेतकरी आणि फळबागा दाराकडून उत्पादित केलेला शेतीमाल सरळ शेतकऱ्यांकडून खरेदी करतील. या कामासाठी एपीएमसी कडून ॲमेझॉन या कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी ही देण्यात आली आहे. आता अमेझॉन कृषी विभागाकडूनसंबंधित परवाना आणि ठियोग बाजूला पहिले खरेदी केंद्र स्थापन करण्याची तयारी करीत आहेत. जे शेतकरी फळ भाजीपाल्याची हात विक्री करत होते अशा शेतकऱ्यांना जागेवरच त्यांच्या माला ची चांगली किंमत देखील मिळेल आणिवाहतूक खर्चही वाचेल.  अमेझॉन भाजीपाला खरेदी करण्यासोबतच व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात शिमला जिल्ह्यात अर्धा डझन पेक्षा जास्त खरेदी केंद्र स्थापन केली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात फळांची खरेदी करण्यात येईल.  स्थानिक एजंट च्या माध्यमातून फळे आणि भाजीपाला खरेदी करून त्या मालाला हरियाणामधील वेअर हाउस असलेल्या ठिकाणी पोहोचवला जाईल आणि या वेअर हाऊस मधून हा माल नंतर देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवि...

शेती : वीज अंगावर पडू नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी

इमेज
शेती : वीज अंगावर पडू नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी वीज पडून मृत्यू झाल्याच्या बातम्या वारंवार कानावर येतात. दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही नुकसान होतं. त्यामुळे वीज अंगावर पडू नये, यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं. आता आपण वीज अंगावर पडणार, हे आपल्या लक्षात कसं येऊ शकतं, वीज अंगावर पडू नये यासाठी काय करावं आणि काय करू नये, तसंच एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यानंतर आपण काय प्रथमोपचार करू शकतो, याची माहिती जाणून घेणार आहोत. वीज अंगावर पडू नये म्हणून... नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो अर्थात एनसीआरबीची आकडेवारी पाहिल्यास भारतात 2017 मध्ये 2885, 2018 मध्ये 2357 आणि 2019मध्ये 2,876 इतक्या जणांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. वीजेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षात घेता भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं एक पत्रक जारी केलं आहे. त्यात वीजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती दिली आहे. सुरुवातीला तुम्ही घराबाहेर असाल तर...

21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस का आहे?

इमेज
21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस का आहे? 21 जून हा 2021 वर्षातला सर्वात मोठा दिवस असणार आहे. याला इंग्लिशमध्ये Summer Solstice म्हटलं जातं. पण हे नेमकं का घडतं? समर सॉलस्टाईस ही एक खगोलीय घटना आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. 21 जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. जगातल्या अनेक देशांमध्ये या दिवशी दिवस 12 तासांपेक्षाही मोठा असतो. यानंतर दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणजे वर्षाच्या या पुढच्या काळामध्ये सूर्य दक्षिण गोलार्धात सरकू लागतो. Summer Solstice म्हणजे काय? Solstice हा शब्द sōlstitium या लॅटिन शब्दावरून आला आहे. या लॅटिन शब्दातल्या sōl या शब्दाचा अर्थ होतो सूर्य. sistere या शब्दाचा अर्थ 'to stand still' म्हणजे स्तब्ध उभं राहणं. साधारण 20 जून ते 22 जून दरम्यानच्या एका दिवशी दरवर्षी समर सॉस्टाईस घडतं. म्हणजे 20, 21 वा 22 पैकी एक दिवस हा त्या वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. यावर्षी 21 जून ह...

शेतकऱ्यांना माहिती आसावी*

इमेज
  * शेतकऱ्यांना माहिती आसावी* *1) क्लोरमेक्वाट क्लोराईड ---::* वाढ निंयञक *2) एन ए ए ---::* नैसर्गीक गळ थांबवीणे *3)जि ए --::* पेशीची संख्या वआकार वाढविणे *4)नायट्रोबेंझीन ---::* कळी व फुले काढणे *5)टायकंटेनाॅल--::* प्रकाश सश्लेषण वाढविणे. . ...... .   *6)ह्युमिक अॅसीड 6% --::* सुपीकता वाढविणे , *7)ह्युमिक अॅसिड 12 %वर --::* पाढ-या मुळाची वाढ ....... *8)बायो स्टिमुलंट--::* नविन पाते फुले लागणे व गळ कमी करणे .... *9)सुक्ष्म अन्नद्रव्ये --::* पिके पिवळी लाल करपा न येऊ देणे, पिकास पोषण देणे ....... *10)स्टिकर --::* पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे ,शोषण करणे.. ....... *11)अमिनो अॅसीड--::* हिरवे व कोवळेपणा वाढविणे *12)अँन्टीआॅक्सीडंट--::* झाडाला तारूण्य वाढविणे... .... . *13)प्रथम अन्नद्रव्ये --::* नञ, स्फुरद, पालाश .. *14)दुय्यमअन्नद्रव्ये--::* मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक *NPK*:- नत्र-स्फुरद-पालाश *19:19:19*:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी *12:61:00*:-फुटवा जास्त येण्यासाठी *18:46:00*:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी *12:32:16*:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्य...

सोयाबीन उत्पादकता वाढविण्यासाठी सूत्रे

इमेज
  सोयाबीन उत्पादकता वाढविण्यासाठी सूत्रे सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात पावसाला सुरुवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलैपर्यंत व ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.   सोयाबीनची पेरणी खरीप हंगामात पावसाला सुरुवात झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलैपर्यंत व ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असल्याची खात्री करूनच करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. जमिनीची २ ते ३ वर्षांत किमान एकदा उन्हाळ्यामध्ये एक खोल (३० ते ४५ सें.मी.) नांगरणी करून नांगरणीच्या विरुद्ध दिशेने वखराच्या २-३ पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी २० गाड्या (५ टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळावे. शेणखतामुळे जमीन चांगली भुसभुशीत राहते. पिकाच्या मुळ्या खोलवर जाऊन पिकाची जोमदार वाढ होण्यास मदत होते. बीजप्रक्रिया     सोयाबीनवर येणाऱ्या विविध रोगांसाठी रोग आल्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बीजप्रक्रिया केल्यास सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोगांच...

आनंदाची बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

इमेज
आनंदाची बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार, मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांची चिंता वाढली होती. यानंतर केंद्र सरकारने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करुन खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणले जातील, असे आश्वासन दिले होते. मोदी सरकारने पाम तेलासह (Palm Oil) विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रती टन 8000 रुपयांची (112 डॉलर्स) कपात केल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाचे (Edible Oils) भाव प्रचंड वाढले होते. खाद्यतेलाच्या किमतीतील वाढीने सामान्यांच्या मासिक खर्चाचा ताळमेळ बिघडला होता. भारताकडून 70 टक्के खाद्यतेल आयात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळत होता. मात्र, मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच खाद्यतेलाचे भाव सामान्य पातळीवर येईल, असा अंदाज आहे. (Good news government slashes tariff value for edible oil import ) केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने शुल्क कपातीची अधिसूचन...