पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ढेमसे लागवड विषयी

इमेज
ढेमसे लागवड विषयी लागवड:              एका ठिकाणी दोन बिया टोकून 2 फुट अंतर ठेवावे.  * लागवडीसाठी जाती * - सागर  नरेश, महिको टिंडा,अंकूर टिंडा,कलश चित्रा इत्यादी  * खत व्यवस्थापन * -  एकरी पिकास 200 किलो निंबोळीपेंड, 2 ट्रेलर शेणखत, 2 किलो पीएसबी, 2किलो ट्रायकोडर्मा, 1.5 (दिड) पोते युरीया,2 पोते सुपर फॉस्फेट, 25 किलो पोटॅश देणे,  युरीया खत 2 ते 3 हप्त्यांत मुळापासून थोडे अंतर ठेवून द्यावे. त्याशिवाय झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, एकरी 3 ते 4 किलो प्रत्येकी देणे. तसेच दोन किलो अँझोटोबॅक्टर देणे.          * ढेमसे लागवड सविस्‍तर माहिती-* 👇                    ढेमसे या पिकास हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची जमीन लागते. हलक्‍या जमिनीत हे पीक लवकर तयार होते. या पिकास उष्ण हवामान मानवते. कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास पिकाची वाढ चांगली होत नाही. रोग व किडींचे प्रमाण वाढते.भरपूर सूर्यप्रकाश या पिकाला चांगला मानवतो. ढेमशाची लागवड पा...

सकस चाऱ्यासाठी लसूण घासची करा लागवड, पशुंसाठी आहे उपयुक्त

इमेज
सकस चाऱ्यासाठी लसूण घासची करा लागवड, पशुंसाठी आहे उपयुक्त लसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० सें.मी. उंचीपर्यंत वाढते. या चारा पिकात जीवनसत्त्व अ आणि ड, प्रथिने, खनिजे भरपूर प्रमाणात असतात. योग्य व्यवस्थापन केल्यास वर्षभर भरपूर, सकस हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. लसूणघास हे पीक काळ्या कसदार, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या, मध्यम प्रतीच्या पोयटायुक्त जमिनीत घेता येते. पिकास थंड हवामान पोषक असते, तसेच उष्ण, कोरड्या हवामानातसुद्धा हे पीक वाढू शकते. आम्लयुक्त जमिनीत उत्पादन कमी येते, कारण अशा जमिनीत बियांची उगवण एकसारखी न होता सुरवातीला नांग्या पडतात. त्यामुळे कालांतराने एकूण झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते._किमान तीन वर्ष हे पीक जमिनीत ठेवता येते. हे लक्षात घेऊन एक खोल नांगरट करून जमिनीची चांगली मशागत करावी. जास्त पावसाच्या प्रदेशात काळ्या कसदार जमिनीत वरंबे प्रमाणापेक्षा जास्त उंच ठेवू नयेत. कारण वाफ्यामध्ये पाणी साचून राहते. घासाच्या रोपांची मर होऊन पीक विरळ होते. मध्यम ते कमी पावसाच्या प्रदेशात वाफे करताना वरंबे नेहमीपेक्षा थोडे रुंद व उंच ठेवावेत._ चार ल...

चला खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिके व हंगामाबद्दल जाणून घेऊया*

इमेज
* चला खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिके व हंगामाबद्दल जाणून घेऊया* जसं की आपणांस ठाऊक आहे की,आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे व भारताची जवळपास 70% जनसंख्या ही शेती व शेतीनिगडित कामाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधित आहे.शेती हा जीवन जगण्यासाठीचा प्राथमिक  व्यवसाय आहे.शेती ही एक अशी प्राथमिक गतिविधी आहे ज्यात मनुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नाची गरज भागवली जाते.शेती म्हणजे, अन्न, गवत, कापडाचे तंतू, प्राणी, मध तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन. पिकांची लागवड प्रामुख्याने हवामान आणि मातीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पिकांची लागवड ही तीन हंगामात विभागली गेली आहे ते तीन हंगाम म्हणजे खरीप, रब्बी आणि उन्हाळी. आज आपण या लेखात या तीन हंगामाविषयीं व त्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांविषयी जाणुन घेणार आहोत. * पिकांचे प्रकार* *खरीप (पावसाळी)हंगाम:* पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारी पिके. महाराष्ट्रात सर्वात जास्त खरिपाचे क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. भारतीय उपखंडामध्ये खरीप पिके ही जून-जुलैमध्ये पेरणी केली जातात आणि ऑक्टोबरच्या आसपास काढले जातात. खरीप पिक...

कधी अवकाळी , कधी थंडी , पिकांची कशी घ्यावी काळजी ? तज्ञांचा मोलाचा सल्ला |

इमेज
कधी अवकाळी , कधी थंडी , पिकांची कशी घ्यावी काळजी ? तज्ञांचा मोलाचा सल्ला  : कधी अवकाळी पाऊस,कधी ढगाळ वातावरण तर कधी कडाक्याची थंडी … बदलत्या वातावरणामुळे सध्या वावरात असलेल्या पिकांवर मोठा परिणाम होतो आहे. मागील दोन तीन दिवस पाऊस झाल्याने पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आहे अशावेळी काय काळजी घ्यावी याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे जाणून घेऊया… पुढील हवामान अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 11 जानेवारी रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी हलका ते मध्यम तर इतर जिल्हयात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे परंतू पिकाच्या संवेदनशी...

बीजप्रक्रिया पद्धती व त्यांचे फायदे

इमेज
बीजप्रक्रिया पद्धती व त्यांचे फायदे कृषी उत्पादनात पिक संरक्षणास जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व बीज प्रक्रियेस आहे. परंतु बियाणे प्रक्रियेस जेवढे महत्व पिक संरक्षणामध्ये द्यावयास हवे तेवढे दिले जात नाही. निरनिराळ्या औषधांच्या फवारण्यांमुळे उभ्या पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण होते तर बियाणे प्रक्रीयेमुळे बियांवरील सुप्तावस्थेत असलेल्या रोगांचे तसेच इतर जिवाणूंचे नियंत्रण सुरुवातीसच होते. उभ्या पिकात दिसणाऱ्या बऱ्याच रोगांचे मूळ बियांमध्ये असते. एकदा असे रोगट बी उगवून आले कि, त्यामधील रोगासाठी खात्रीशीर असा नियंत्रण उपाय राहत नाही. बीज प्रक्रिया म्हणजे काय? : सर्वसाधारणपणे बीज प्रक्रिया म्हणजे हलके, किडके, रोगयुक्त, आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करुन अशा बियाण्याचे रोग व किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला ‘बीजप्रक्रिया’ म्हणतात. बीज प्रक्रियेचे फायदे : १. पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते. २. बियाणे व रोगांद्वारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येते. ३. बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते व रोपांना शेतात प्...

मुरघासची पशुसंवर्धनात मोलाची भूमिका.. जाणून घ्या मुरघासचे फायदे व कसा तयार करतात मुरघास

इमेज
मुरघासची पशुसंवर्धनात मोलाची भूमिका.. जाणून घ्या मुरघासचे फायदे व कसा तयार करतात मुरघास :हिरवा चारा विशिष्ट कालावधीतच घेता येत असल्याने तो बाराही महिने उपलब्ध नसतो. त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरव्या चाऱ्याची लागवड केल्यास एक विशिष्ट प्रक्रिया करुन हा चारा साठवून ठेवता येतो. मुरघास शास्त्रशुध्द पध्दतीने साठवला तर बाराही महिने गुरांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध करता येतो. हिरव्या चाऱ्यामुळे वाढते दूध पशुपालन व दुग्धव्यवसायामध्ये हिरव्या चाऱ्याचे अन्यय साधारण महत्व आहे. या व्यवसयामध्ये 60 ते 65 टक्के खर्च हा केवळ जनावरांच्या चाऱ्यावर होतो. व्यापारी तत्वावर दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे दूध उत्पादन घटले नाही पाहिजे असे वाटत असेल तर त्यांनी गुरांना त्यांच्या रोजच्या आहारात हिरवा चारा देणे आवश्यक आहे. मुरघास हा दूध वाढीसाठी चांगला पर्याय शेतकऱ्यांना आता उपलब्ध झाला आहे. असा असतो मुरघास हिरवा चारा योग्य वेळी कापुन तो बंदिस्त खड्ड्यात हवाबंद स्थितीत दोन महिन्यापर्यंत ठेवला जातो. या दरम्यान साठवून ठेवलेल्या चाऱ्यात उपयुक्त अशा रासायनिक प्रक...

जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी..

इमेज
जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी.. शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होत असतात. यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती चांगल्याप्रकारे होते. बरेच शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात. शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा देखील वापर करणे तितकेच महत्वाचे आहे. शेणखत जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते. जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी – 1) लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असणे गरजेचे आहे. शेणाखतामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या अळी आढळून येते. ज्यास बरेचसे शेतकरी ‘शेणकिडे’ म्हणून संबोधतात. अशा अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात. 2) भुंगेरावर्गीय किडींची मादी मे किंवा जून महिन्यात शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्य...

गहू लागवडीचे तंत्रज्ञान व व्यवस्थापन.. महाराष्ट्रातही पंजाब - हरियाणाच्या बरोबरीने गव्हाची उत्पादकता वाढू शकते...! जाणून घ्या कसे..

इमेज
गहू लागवडीचे तंत्रज्ञान व व्यवस्थापन.. महाराष्ट्रातही पंजाब - हरियाणाच्या बरोबरीने गव्हाची उत्पादकता वाढू शकते...! जाणून घ्या कसे.. राज्यात यंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने यंदा गव्हाची लागवडही वाढणार आहे. मात्र, लागवड वाढीबरोबरच गव्हाच्या उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न केल्यास अधिक उत्पादन व पर्यायाने अधिक उत्पन्न मिळण्याची देखील संधी आहे. त्यासाठी गहू लागवडीचे तंत्रज्ञान व व्यवस्थापन तसेच इतरही बाबींचे नियोजन समजून घेणेही आवश्यक आहे. महाराष्ट्रातील गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे भारतातील पंजाब व हरियाणा राज्यांची गव्हाची सरासरी उप्तादकता ४५ क्विं./हेक्‍टरच्या आसपास आहे. महाराष्ट्राची गव्हाची सरासरी उप्तादकता फक्त 20 क्विं./हेक्‍टरी इतकीच आहे. काय आहे महाराष्ट्रातील कमी उत्पादकतेची कारणे व याबाबींचे काळजी घेतल्यास महाराष्ट्रही पंजाब – हरियाणाच्या बरोबरीने गव्हाचे उत्पादन घेऊ शकतो…! * हलक्या ते मध्यम जमिनीत गव्हाची लागवड. * गहू पिकासाठी पाण्याची करतरता. * पाण्याची उपलब्धता असल्यास इतर पिके घेण्याचा कल. * शिफारस केलेल्या वाणाची लागवड न करणे. * गहू पीक वाढीच्या सुरवातीच्या दाणे...

जानेवारीमध्ये करावयाची शेतीची कामे

इमेज
*_🪴जानेवारीमध्ये करावयाची शेतीची कामे 🎋_* * *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *_✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮_* _रब्बी पिके चांगल्या अवस्थेत आहेत हरभरा, ज्वारी व इतर पिके डौलदार पाहून आनंद होतोय. वाढलेली थंडी गहू पिकास चांगलीच मानवली आहे. रब्बी चांगली पिकावी आणि त्याहून चांगला भाव मिळावा ही इंग्रजी नवीन वर्षाची प्रार्थना योग्य नियोजन आणि त्याची उत्तम अंमलबजावणी हेच यशाचे, आनंदाचे गमक ठरते याला शेती व्यवसाय तरी कसा अपवाद ठरू शकेल किंबहुना नियोजनाच्या अभावामुळेच शेतीचे खूप मोठे नुकसान होताना दिसते कीडरोग यांचा प्रादुर्भाव आढळल्यास उपाययोजनाच्या मागे धावण्यापेक्षा हवामानावर, ऋतू चक्रावर आधारित नियोजन शेती अधिक फायदेशीर बनवू शकते. याकरिता जानेवारी महिन्यात करावयाच्या शेती कामाचे कँलेंडर साधारणतः खालील प्रमाणे मांडता येईल._ *_📌 रब्बी पिकांची काळजी अशी घ्या_* _*🥜 उन्हाळी भुईमुग :* उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करावी. उगवण चांगली होणेसाठी प्रथम जमीन ओलावून वाफशावर पेरणी करा. पेरणीसाठी फुले प्रगती, एस.बी.११, एम.१३, टी.जी- २६, टी.ए.जी.२४, आय.सी.जी.एस.११, टी.पी....

विद्राव्य खते म्हणजे नेमके काय ?(water soluble fertilizer)

इमेज
विद्राव्य खते म्हणजे नेमके काय ?(वाटर soluble fertilizer)  पिकांना योग्य वाढीसाठी आवश्यक प्रमाणात अन्नद्रव्ये लागतात. ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमार्फत जलद आणि सोप्या पद्धतीने देता येतात. आज आपण पाहुयात की विद्राव्य खते म्हणजे काय ? विद्राव्य खते – पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये पुरविणारी आणि पाण्यात संपूर्ण विरघळणारी खते म्हणजे विद्राव्य खते होय. यांचा वापर कसा करावा ? फवारणी द्वारे ठिबक सिंचन पद्धतीने यांच्या वापराचे फायदे काय ? पिकांना जलद गतीने अन्नद्रव्ये मिळतात. अतिपाऊस किंवा पावसाचा मोठा खंड यामध्ये विद्राव्य खतांचा वापर फायद्याचा ठरतो. पिके पानांद्वारे अन्नद्रव्ये शोषून घेतात. खताची नासाडी होत नाही. विशेष बाब – पिक फुल किंवा फलधारणा अवस्थेत असल्यावर याचा वापर फायदेशीर असतो. काही महत्त्वाची विद्राव्य खते – १९:१९:१९ ०:५२:३४ १२:६१:० ०:०:५० १३:०:४५ ०:०:५०:१८ १३:४०:१३ २४:२८:० १९:१९:१९  पिकाच्या सुरुवातीच्या काळात वापरावे. पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी हे वापरतात. एन पी के हे घटक सम प्रमाणात असतात. १२:६१:० याच्या वापराने पिकाची मुळे वाढ होण्यास मदत होते. फुलधारणा, पि...

“स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे? समजून घ्या.

इमेज
“स्वामिनाथन आयोग” नेमका काय आहे? समजून घ्या. स्वामिनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात, जी समिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये स्वामिनाथन हे अध्यक्ष होते. भारतीय गरीब शेतकर्‍यांच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. स्वामिनाथन आयोगाच्या महत्वाच्या शिफारशी या पुढील प्रमाणे आहेत. १. शेतकऱ्यांना असा हमीभाव मिळावा की त्यांचा सरासरी उत्पादन खर्चाच्या ५०% इतका नफा देणारा असावा. म्हणजेच एकूण विक्रीच्या ३३.३३% इतका नफा हा शेतकऱ्यांना मिळावा. २. कृषी पतधोरणाची गरज म्हणून वैद्यनाथन समितीच्या शिफारशी सहकार क्षेत्रात लागू व्हाव्यात. *वैद्यनाथन समितीने सहकार क्षेत्रात काही शिफारशी दिल्या आहेत* त्यातील महत्वाच्या पुढील प्रमाणे: दहा जणांचा समूह करून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकरी संस्था या लहान पण सहकार तसेच व्यवसाय तत्वावर असाव्यात. कर्जाचा कालावधी हा कर्जाचा उपयोग व कर्जधारकाची परिस्थिती यावर अवलंबून ...