पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इफकोने लॉन्च केला जगातील पहिला नॅनो युरिया द्रव्य; अर्धा लिटरमध्ये होईल एका बोरीचं काम

इमेज
इफकोने लॉन्च केला जगातील पहिला नॅनो युरिया द्रव्य; अर्धा लिटरमध्ये होईल एका बोरीचं काम इंडियन फारमर्स फर्टिलाइजर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफको) भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. इफकोने नॅनो युरिया द्रव्याची तयार केलं आहे. या अर्धा लिटर नॅनो युरियाच्या बाटलीची किंमत फक्त २४० रुपये निश्चित करण्यात आली आहे. जे युरियाच्या गोणीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. इफकोने ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने झालेल्या ५० व्या वार्षिक सामान्य बैठकीत प्रतिनिधी महासभेच्या सदस्यांच्या उपस्थितीत लॉन्च केली आहे. यामुळे शेतकरी युरियाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल, असं डॉ यूएस अवस्थी, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, इफ्को यावेळी म्हणाले. इफ्कोने सांगितले की युरियाचा वापर कमी करण्यात यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत द्रव्य युरिया लॉन्च करण्यात आले आहे. इफ्कोच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी कलोल येथील नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये स्वदेशी आणि प्रोप्रायरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नॅनो...

खत : तुमच्या जवळच्या दुकानात खताचा किती स्टॉक उपलब्ध आहे, हे कसं पाहायचं?

इमेज
खत : तुमच्या जवळच्या दुकानात खताचा किती स्टॉक उपलब्ध आहे, हे कसं पाहायचं? बऱ्याचदा असं होतं की, आपण दुकानात गेल्यावर खताचा साठा शिल्लक नाही, असं दुकानदार सांगतो. कधीकधी खरंच त्या दुकानात खताचा स्टॉक शिल्लक नसतो, तर कधीकधी जास्तीचा भाव मिळावा म्हणून दुकानदाराकडून तसं सांगितलं जातं. त्यामुळे मग आपण राहत असलेल्या भागातील खताच्या दुकानात आज रोजी किती साठा उपलब्ध आहे, हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं आणि हे आपण आपल्या मोबाईलवर फक्त 5 मिनिटांत जाणून घेऊ शकतो. ते कसं याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत. खताचा उपलब्ध साठा कसा बघायचा? भारत सरकारच्या खत मंत्रालयाच्या वेबसाईटवर देश आणि राज्यातील खताच्या साठ्याविषयी सविस्तर माहिती दिलेली असते. कोणत्या दुकानात खताचा किती साठा शिल्लक आहे, याची माहिती इथं दररोज अपडेट केली जाते. ती पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला fert.nic.in असं सर्च करावं लागेल. त्यानंतर भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडील Fertilizer Dashboard या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे e_urvak  नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओप...

शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या*

*💥 शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या* *🎯 टोमॅटो उत्पादकांना २५ कोटी रुपयांचा फटक, पंधरा दिवसापासून बंद आहेत बाजार समित्या* *👉 नगर जिल्ह्यातील* अकोले, संगमनेर, भागात टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. पण येथील बाजार समित्या बंद असल्याने किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर खाली आले आहेत. *💁‍♀️ यामुळे पंधरा* दिवसात सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. *🎯 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत व इस्त्राईल यांच्यात ३ वर्षासाठी कृषी करार*  *👉 इस्त्राईल आणि भारत* यांच्यात कृषी क्षेत्रातील वाढती भागीदारी पुढे नेताना, दोन्ही सरकारांनी शेतीमधील सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शविली. *💁‍♂️ तसेच कृषी सहकार्यात* विकासासाठी तीन वर्षांच्या कार्य कार्यक्रम करारावर स्वाक्षरी केली, आणि सतत वाढणार्‍या द्विपक्षीय भागीदारीची पुष्टी केली आणि मान्यता दिली. *द्विपक्षीय संबंधात कृषी आणि जल क्षेत्र याचा समावेश असेल.* *🎯 नाशिक जिल्ह्यात शेतकरी अपघात विमा योजना लागू; जाणून घ्या काय आहे योजना*  *👉 शेतकऱ्यांना* एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा शेतात काम करीत असताना एखादी इजा झाली कि...

तेलः खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची 3 कारणं कोणती? तेल कधी स्वस्त होणार?

इमेज
तेलः खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची 3 कारणं कोणती? तेल कधी स्वस्त होणार? मागच्या आठवड्यात एक बातमी तुम्ही वाचली असेल ज्यात म्हटलं होतं की, एप्रिल महिन्यात भारतात घाऊक व्यवहारांसाठीचा महागाई दर चक्क 10.49% नी वाढला. त्यापूर्वी मार्च महिन्यात तो साडे सात टक्क्यांनी आणि फेब्रुवारी महिन्यात तो सव्वा चार टक्क्यांनी वाढला होता . ही बातमी खोलात जाऊन वाचली तेव्हा लक्षात आलं की भाजीपाल्याच्या किंमती उलट दीड टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. पण, पेट्रोल, डिझेल, इंधनं, तेल आणि उर्जा या क्षेत्रातली महागाई एप्रिल महिन्यात तब्बल 20%नी वाढली होती. म्हणजेच या वस्तूंचे दरही एका महिन्यात किमान 20%नी वाढले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी गाठलीच आहे. त्यात आता भर पडलीय ती खाद्यतेलाची. किंबहुना हे दरही मागचं वर्षभर वाढतच आहेत. आता याच आठवड्यातल्या ताज्या आकड्यांनुसार मागच्या 11 वर्षांतला उच्चांक खाद्यतेलांच्या किमतीने गाठला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरणाच्या वेबसाईटवर नुकतेच ताजे आकडे प्रसिद्ध झाले आहेत आपण घरगुती स्वयंपाकासाठी प्रामुख्याने शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, मोहरीचं त...

खतांवरील अनुदान कसं मिळणार?, DAP खत 1200 रुपयांना कसं मिळवायचं? ही कागदपत्रं आवश्यक

इमेज
खतांवरील अनुदान कसं मिळणार?, DAP खत 1200 रुपयांना कसं मिळवायचं? ही कागदपत्रं आवश्यक केंद्र सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी डाई अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खतावरील अनुदान वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. fertilizer subsidy on DAP केंद्र सरकारनं गेल्या काही दिवसांपूर्वी डाई अमोनिया फॉस्फेट (डीएपी) खतावरील अनुदान वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या निर्णयानुसार डीएपीच्या 50 किलोच्या एका पोत्यावरील अनुदान 700 रुपयांनी वाढवून 1200 करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं डीएपीवरील अनुदान वाढवल्यानं शेतकऱ्यांना डीएपी 1200 रुपयांना उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. (how to get fertilizer subsidy on DAP given by central government for farmers )  डीएपी खत कसं मिळवायचं शेतकऱ्यांना डीएपी खरेदी करण्यासाठी 1200 रुपये द्यावे लागतील. डीएपी खरेदी करताना शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड किंवा शेतकरी कार्डची प्रत द्यावी लागणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना बायोमेट्रिक म्हणजेच अंगठ्याचे ठसे द्यावे लागतील. त्यानंतर केंद्र सरकार स...

लिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र

इमेज
लिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र भारतामध्ये आंबा, केळीच्या नंतर लिंबुवर्गीय फळांच्या उत्पादनाचा तिसरा क्रमांक लागतो. देशातील या फळपिकांखालील क्षेत्र 0.483 मिलीयन हेक्टर असून 4.251 मिलीयन टन एवढे वार्षिक उत्पन्न आहे. लिंबूवर्गीय उत्पादनात जगात भारताचा सहावा क्रमांक लागत असून 4.8% वाटा भारताचा आहे. या फळपिकांखालील क्षेत्रात वार्षिक 9.3% या दराने वाढत असले तरी उत्पादनात मात्र त्याप्रमाणात वाढ झालेली नाही. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे लिंबूवर्गीय उत्पादन फारच कमी म्हणजे ते फक्त 8.8 टन/हे. आहे. तेच प्रगत राष्ट्रात 25 ते 30 टन/हे. आहे. विदर्भात लिंबूवर्गीय फलोत्पादनाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी 80 लक्षाहून जास्त रोपे येथील 325-350 शासकीय व खाजगी रोपवाटीकेत तयार करून विकली जातात. रोपवाटिकेचे चांगले व्यवस्थापन हे स्वस्थ व उत्पादनक्षम लिंबूवर्गीय फलोउद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सातत्याने उत्तम फळाचे भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाचे जेवढे महत्त्व आहे. तेवढेच मातृवृक्षाला कीड व रोगापासून सुरक्षित ठेवणेही महत्त्वाचे आहे. विषाणूग्रस्त रोगट मातृवृक्ष...

खरीप तोंडावर, मात्र अद्याप रब्बीची खरेदीही नाही*

*👨‍🌾 खरीप तोंडावर, मात्र अद्याप रब्बीची खरेदीही नाही* *🎯 रब्बी हंगाम संपून* खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप राज्यातील रब्बी पिकांच्या खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू झालेले नसल्याने या केंद्रांवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे.  *💁‍♀️ दरम्यान राज्यातील १६ जिल्ह्यांमधून* तीन लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. *👉🏻 जळगाव आणि बुलडाणा* या दोन जिल्ह्यांना ६० हजार क्विंटल रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांना केवळ प्रतिजिल्हा ५०० क्विंटल रब्बी मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. *💁‍♂️ राज्यात मार्केटिंग* फेडरेशनमार्फत रब्बी पणन हंगाम २०२०-२१ मध्येे आधारभूत किमतीवर शेतमाल खरेदी करण्यात येत असून, त्यासाठी *शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी* करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  *👉🏻 मागील महिन्यापासून* शेतकऱ्यांनी ऑनलाइन पध्दतीने नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.  *💁‍♂️ मात्र रब्बी हंगाम* संपूण खरीप हंगाम सुरू होण्याची वेळ आली असली तरी अद्याप जिल्हा केंद्रांना खरेदी सुरू करण्याच्या सूचन...

हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो?

इमेज
हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? केंद्र सरकार शेतमालाची हमीभावानं खरेदी करत आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना म्हटलं आहे. पण, याच हमीभावाच्या मुद्द्यावर दिल्लीच्या सीमांवर शेतकरी गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. सरकारनं हमीभावाचा कायदा करावा, अशी त्यांची मागणी आहे. पण, हमीभाव हा काय प्रकार आहे आणि तो कसा ठरवतात? त्याचा शेतकऱ्याला खरंच फायदा होतो का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा आपण आता प्रयत्न करणार आहोत. हमीभाव म्हणजे काय? MSP म्हणजेच Minimum Support Price यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोली भाषेत हमीभाव असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हमीभाव ही एक प्रणाली आहे, ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असतं... गॅरेंटी देत असतं. या प्रणालीअंतर्गत सध्या 23 शेतमालांची खरेदी सरकार करतं. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे. म्हणजे काय तर या शेतमालाच्या खरेदीचे दर सरकार जाहीर करतं आणि मग सरका...

बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने कमी वेळेत तयार होते उत्तम दर्जाचे कंपोस्ट, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत

इमेज
बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाने कमी वेळेत तयार होते उत्तम दर्जाचे कंपोस्ट, जाणून घ्या तयार करण्याची पद्धत जर बायोडायनॅमिक तंत्रज्ञानाचा विचार केला तर हे मुख्यत्वे करून भारतीय वेदांवर आधारीत जैवऊर्जा म्हणजेच बायोडायनॅमिक तंत्र होय. या तंत्रात ब्रह्मांडातील ग्रह, तारे यांचा पृथ्वी वनस्पती आणि जलचरावर होणारा सकारात्मक परिणामांचा अभ्यास आणि विचार केला जातो. या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे या तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा इतर रासायनिक गोष्टीचा कुठल्याही पद्धतीचा वापर न करता कमी वेळेत उत्तम दर्जाचे कंपोस्ट. या तंत्रज्ञानान तयार करता येते. या तंत्रज्ञानात प्रत्येक अन्नघटकांचा जसं की नत्र, स्फुरद, पालाश इत्यादीचा वेगवेगळा विचार करण्याऐवजी सगळ्या अन्नद्रव्यांचा एकत्रित विचार केला जातो. शेणखत हे शेतीसाठी फार उपयुक्त आहे उपयुक्त आहे परंतु सध्याच्या काळामध्ये जनावरांची संख्या आणि त्यापासून शेणखताची उपलब्धता फार कमी झालेली आहे. आणि जे काही उपलब्ध आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे म्हणजेच त्यामध्ये गवऱ्या, तणाच्या बिया किंवा प्लास्टिक मिसळून तेएवढे उपयुक्त राहत नाही.परंतु बायोड...
हापूस आंब्याला अल्फान्सो ऐवजी 'हापूस' हे नाव कसं पडलं? आंबा म्हणजे फळांचा राजा! त्यातल्या त्यात हापूस म्हटलं तोंडाला पाणी सुटतंच . फळांच्या या राजाला जगभरातून मागणी असते. आणि देशाविदेशात तर हापूस जणू काही पेटंट झाला आहे. म्हणूनच फळांच्या या राजाबद्दल ही चवदार माहिती जाणून घेणं महत्त्वाचं. या आंब्याला हापूस का म्हणतात? हापूसला अल्फान्सो असंही म्हटलं जातं, आणि या नामकरणात भारतातील पोर्तुगिजांचाही मोठा वाटा आहे. पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते. पोर्तुगिजांचं इथे राज्य उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. जिओग्राफीकल इंडिकेशन जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार अल्बकर्की यांनी गोव्यात मोठी भटकंती केली होती. तिथल्या आंब्यांच्या विविध जातींवर त्यांनी प्रयोग करत आंब्याची ही नवी जात विकसित केली. त्यावरून या आंब्याला अल्फान्सो नाव मिळालं. पण स्थानिक लोक या आंब्याला अफूस म्हणू लागले. आंब्याची ही जात महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोहोचेस्तोवर लोकांच्या तोंडी याचा उच्चार हापूस असा झाला होता. तिथून हा आंबा दक्षिण गुजरात आणि दक्षिण भारतात पोहोचला. हापूस आंब्यांचा ...

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

🌾  शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी  💁‍♂️  *शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! - ज्यादा दराने खत विक्री केल्यास - येथे करा तक्रार*   💰  आपण काही दिवसापूर्वी घेतलेल्या माहितीप्रमाणे - केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांतील अनुदानात वाढ केली - त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत 🤫  मात्र जर खत विक्रेते पूर्वीच्या जादा दराने -  खत विक्री करत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवावी - असे कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे 💁‍♂️  *येथे करा तक्रार ?* 🔰  शेतकऱ्यांना खतांबाबत कोणतीही समस्या आल्यास  - कृषी आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडून दखल घेतली जाईल.  🔰  त्यासाठी शेतकऱ्यांना ८४४६१ १७५०० या भ्रमणध्वनीवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान तक्रार करता येईल.  🔰  याशिवाय आयुक्तालयाने १८०० २३३ ४००० हा टोल फ्री क्रमांक देखील -  शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.  🔰  *ज्यादा दराने खत विक्री केल्यास* -  तक्रार कुठं करायची याबद्दलची माहिती , प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतर शेतकर्...

अन्न परिरक्षण : काळाची गरज

इमेज
अन्न परिरक्षण : काळाची गरज(Food Preservation) अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून आणणाऱ्या घटकांवर नियंत्रण राखणे शक्य होते. अन्नपदार्थ खराब होण्याची कारणे अनेक असल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या अन्नपदार्थांसाठी व तो किती काळ सुरक्षितपणे साठवावयाचा आहे, यानुसार परिरक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती उपयोगात आणल्या जातात. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी जेव्हा शेती व पशुपालनाचा उदयदेखील झालेला नव्हता, तेव्हा मानवाने नैसर्गिकरीत्या परिरक्षित झालेले खाद्यपदार्थ कसे गोळा करावे, तसेच अन्नपरिरक्षणासाठी निसर्गाला कशा प्रकारे साहाय्य करावे, याचे ज्ञान प्राप्‍त केले होते. अश्मयुगातील मानव तेलबिया व इतर बिया हिवाळ्यासाठी साठवून ठेवत असे. तसेच मांस व मासे उन्हात वाळविले असता ते टिकू शकतात, याचाही त्याने शोध लावला होता. अशा रीतीने इतिहासपूर्व काळापासून अन्नपरिरक्षणाच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. उदा.अन्नपदार्थ सुकविणे व आंबविणे (किण्वन) या का...

तीनही हंगामात घ्या वांग्याचे पीक; होईल उत्पन्नात वाढ जाणून घ्या लागवड पद्धत

इमेज
तीनही हंगामात घ्या वांग्याचे पीक; होईल उत्पन्नात वाढ जाणून घ्या लागवड पद्धत अनेक शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात. या शेतीत वांग्याचे पीक हे अधिक पैसा देणारं आहे. हे पीक राज्यातील कोणत्याही भागातील कोणत्याही जमीन प्रकारात घेतलं जातं. पण जर तुमची शेत जमीन ही मध्यम काळी असेल तर तर वांग्याचे पीक जोमाने वाढते. जमिनीचा सामू 6 ते 7 असल्‍यास पिकाची वाढ चांगली होते. नदीकाठच्‍या गाळवट जमिनीत वांग्‍याचे उत्‍पादन चांगले येते. कशी कराल पूर्वमशागत मुख्‍य शेतात रोपांची लागवड करण्‍यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. कुळवाच्‍या शेवटच्‍या पाळीसोबत दर हेक्‍टरी 30 – 50 गाडया शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्‍यावे. लागवडीचा हंगाम वांग्‍याची लागवड तिनही हंगामात करता येते.खरीप बियांची पेरणी जूनच्‍या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जूलै, ऑगस्‍टमध्‍ये केली जाते. रब्‍बी किंवा हिवाळी हंगाम-बियांची पेरणी सप्‍टेबर अखेर करतात आणि रोपे ऑक्टोबर- नोव्‍हेंबरमध्‍ये लावतात.उन्‍हाळी हंगाम–बी जानेवारीच्‍या दुस-या आठवडयात पेरून रोपांची लागवड फेब्रूवारीत करतात. वाण मांजरी गोटा : या ...

मध्यप्रदेशातील बियाणे नाही येणार राज्यात, बियाणे कंपन्यांवर आली निर्बंध

इमेज
मध्यप्रदेशातील बियाणे नाही येणार राज्यात, बियाणे कंपन्यांवर आली निर्बंध मध्यप्रदेश सरकारच्या शेतकरी कल्याण तथा कृषी विकास संचालनालयाच्या उपसंचालकांनी 20 एप्रिल 2021 रोजी त्यांच्या स्थानिक पातळीवरील बियाणे इतर विभागात किंवा परराज्यात विक्री करण्यास बियाणे कंपन्यांना सक्त मनाई केली आहे. यावेळी मध्य प्रदेश शासनाने नमूद केले की, यावर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई होण्याची शक्यता असल्याने सदर निर्बंध लागू करत असल्याचे म्हटले आहे. परंतु या निर्णयाचा परिणाम थेट महाराष्ट्रावर होणार आहे कारण दरवर्षी मध्यप्रदेश मधून आठ ते दहा लाख क्विंटल बियाणे हे महाराष्ट्रा मध्ये येते. या निर्णयामुळे महाराष्ट्रात बियाणे टंचाई निर्माण होण्याची भीती महाराष्ट्र सरकारला वाटते. मध्यप्रदेश सरकारने बियाणे विक्रीवर मनमानी पद्धतीने निर्बंध लागू केल्याबद्दल कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार व कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. यासंबंधी श्री. एकनाथ डवले यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव अश्विनी कुमार यांना पत्र लिहिले आहेव मध्य प्रदेश सरकारने लावलेल...

आरोग्यदायी ड्रॅगन फळ व प्रक्रियायुक्त पदार्थ

इमेज
आरोग्यदायी ड्रॅगन फळ व प्रक्रियायुक्त पदार्थ ड्रॅगन फळ हे २१ व्या शतकातील आश्चर्यकारक फळ म्हणून ओळखले जाऊ लागले असून त्याने भारतीय फलोत्पादनामध्ये सद्यस्थितीत एक क्रांती घडवून आणली आहे. शेतकरी आणि ग्राहकांना एक वरदान ठरले आहे. ड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जाते. अलीकडे भारतामध्येही या पिकाची लागवड सुरू झाली आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून गुलाबी रंग व आतील गर पांढरा, वरून पिवळा व आतील गर पांढरा व वरून गुलाबी व आतून गर गुलाबी अशा तीन प्रकारांत हे फळ येते. या फळाला आशियाई देशात पिताहाया किंवा पिताया म्हणतात. वेल छत्रीसारखी दिसते. साधारणतः या वेलीची आयुष्य मर्यादा १७ ते २० वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्यांचा वापर होतो. कोणत्याही जमिनीत हे पीक येत असले तरी पोषक जमीन, नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास त्याच्यापासून चांगले उत्पादन मिळते. या वेलाची फुले रात्री उमलतात. त्यांचे पराग सिंचन निशाचर...

खत किंमत वाढ: खतांच्या किमती वाढल्याचं नेमकं प्रकरण काय आहे?

इमेज
खत किंमत वाढ: खतांच्या किमती वाढल्याचं नेमकं प्रकरण काय आहे? रासायनिक खतांच्या वाढत्या किमती हा राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलत असल्याचं भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयानं म्हटलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. "आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना खतांची ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे," असं शरद पवारांनी म्हटलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही केंद्र सरकारला पत्र लिहून खतांवर सरकारनं अनुदान जाहीर करावं, अशी मागणी केली आहे. "गेल्या एका वर्षात कोरोना साथ आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आर्थिक स्थिती नाजूक आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी अनुदान देण्यात यावे. याबाबत सर्वांशी चर्चा करून केंद्रीय मंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा," अस...

खरीपची तयारी करत आहात? बियाणे खरेदी करतेवेळी काय घ्याल काळजी

इमेज
खरीपची तयारी करत आहात? बियाणे खरेदी करतेवेळी काय घ्याल काळजी आता काही दिवसांमध्ये पेरणीचे दिवस डोक्यावर येऊन ठेपले आहेत सगळीकडे खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले की वेग वेगळ्या भागांमध्ये पेरणीला सुरुवात होते. परंतु आपल्याला माहिती आहे की पेरणीसाठी उत्कृष्ट प्रमाणित बियाणे असणे हे फार आवश्यक असते. बियाणे जर निकृष्ट दर्जाचे असेल तर त्याचा पूर्ण फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आणि पूर्ण हंगाम वाया जातो. तसे पण मागच्या वर्षी पाहिले की सोयाबीन पट्ट्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही परिणामी याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. म्हणून बियाणे खरेदी करायच्या अगोदर बळीराजाने कोणती काळजी घ्यावी यासंबंधीचे विवेचन या लेखात करण्यात आले आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ते आपण पाहू.    1) बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी सगळ्यात अगोदर लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे बियाणे खरेदी करताना ते परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. 2) दुसरे महत्त्वाचे म्हणजे जेव्हा बियाणे खरेदी कराल तेव्हा संबंधित विक्रेत्या...