पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पिकांसाठी उपयुक्त आहे गंधक, पिकाच्या वाढीसाठी आवश्यतक अन्नद्रव्य

इमेज
पिकांसाठी उपयुक्त आहे गंधक, पिकाच्या वाढीसाठी आवश्यतक अन्नद्रव्य गंधक पिकाच्या वाढीसाठी लागणारे एक आवश्‍यक अन्नद्रव्य आहे. वनस्पतीमधील अमिनो आम्ले तयार करण्यासाठी गंधक काय एक आवश्यक घटक आहे. जीव रासायनिक प्रक्रियेमध्ये गंधकाचा सहभाग महत्त्वाचा असून वनस्पती श्वसन क्रिया, तेलनिर्मिती व हरितद्रव्य तयार करण्यासाठी गंधक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. जास्त उत्पादन देणारे संकरित वाण प्रत्येक हंगामात गंधकाचे मोठ्या प्रमाणावर शोषण करतात. परंतु आपल्याकडून जमिनीमध्ये त्या प्रमाणात गंधकयुक्त खते टाकली जात नाही.आपण जर विचार केला तर नत्रयुक्त खतामध्ये अमोनियम सल्फेट ऐवजी युरियाचा वापर वाढत आहे. पिके जेवढे स्फुरदमुळांद्वारे घेतात तेवढेच गंधकसुद्धा घेतात. या लेखात आपण गंधकाचे पिकांना होणारे फायदे जाणून घेणार आहोत. गंधकाचे महत्व(Importants of sulphur) •गंधकाच्या वापरामुळे उत्पादन आणि लाभांशात वाढ होते. •गंधकाच्या वापरामुळे कृषिमालाच्या उत्पादकतेत व गुणवत्तेत वाढ होते. •गंधकाच्या वापराने जमिनीच्या आरोग्य आणि उत्पादकता टिकवता येते. •गंधकाच्या वापराने नत्राची कार्यक्षमता वाढते व उपलब्धता देखील ...

बागायती शेतात उशिराने गव्हाच्या पेरणी केल्यास अधिक उत्पादन येण्याकरिता महत्त्वाची सूत्रे

इमेज
बागायती शेतात उशिराने गव्हाच्या पेरणी केल्यास अधिक उत्पादन येण्याकरिता महत्त्वाची सूत्रे गहू पिकाची पेरणी करण्यास उशीर झाल्यास योग्य उत्पादन तंत्राचा अंगीकार करून 15 डिसेंबरपर्यंत पेरणी करूनही बऱ्यापैकी गव्हाचे उत्पादन होऊ शकते. 15 डिसेंबर नंतर जसजसा उशीर होत, जाईल तसा-तसा गहू पिकाला थंडीचा कालावधी कमी मिळून उत्पादनात घट संभवू शकते. उशिरा पेरणीसाठी कोणत्या प्रकारचे गहूची लागवड केली पाहिजे याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी दिली आहे. बागायती उशिरा पेरणी करता पीडीकेव्‍ही सरदार (AKAW 4210-6), AKAW 4627, AKAW 381, पूर्णा (AKAW 1071) यासारख्या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. गहू पिकाच्या पीडीकेव्‍ही सरदार (AKAW 4210-6) या वाणाचे अधिक उत्पादन व अधिक मीळकतीसाठी पेरणी 26 नोव्हेंबर ते दोन डिसेंबरच्या दरम्यान करावी अशी शिफारस प्रसारीत करण्यात आली आहे. यासर्व संबंधित वाणाचे सर्व गुण वैशिष्ट्ये लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार ओलिताची सोय उपलब्धता लक्षात घेऊन योग्य त्या वाणाची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष सल्ला घेऊन उशिरा बागायती पेरणीसाठी वाणाची निवड केली जाऊ श...

काय आहे शेतकरी असल्याचा दाखला? कसा काढायचा?

इमेज
काय आहे शेतकरी असल्याचा दाखला? कसा काढायचा? भारत हा कृषीप्रधान देश आहे, असं म्हटलं जातं. कोरोना काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी व कृषीपूरक व्यवसायांनी सावरल्याचं समोर आलं होते. शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र कुठे काढायचं.हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते ? शेतकरी प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता. कृषी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यास फायदा होतो. जमीन खरेदी करत असताना देखील अनेकदा शेतकरी प्रमाणपत्र सादर करावं लागते. दाखला काढताना लागणारे कागदपत्रे… पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं शेतकरी असल्याचं प...

शेतातील व घरातील घूस, उंदीर मारण्याचे अगदी सोपे उपाय!

इमेज
शेतातील व घरातील घूस, उंदीर मारण्याचे अगदी सोपे उपाय! घूस, उंदीर सारखे प्राणी मारण्यासाठी युटूबर सांगितलेले किंवा ऐकीव उपाय हे अशास्त्रीय पद्धतीचे आहे. कारण यामुळे घुशींचा बंदोबस्त होत नाही. मात्र मनस्ताप नक्की होतो. असे होऊ नये यासाठी खालील गोष्टी तुमची मदत करतील…. आपल्या घराचे घुशींपासून प्रथम संरक्षण करायचे असेल तर आपल्या घरच्या आजूबाजूला उरलेल्या अन्नाचे तुकडे किंवा शिळे अन्न फेकून देणे टाळा. बाजारात घुशींना मारण्यासाठी रकुमीन शुअर नावाचे औषध मिळते. हे औषध निवासी जागांवर, कुक्कुटपालनांमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी ठेवल्यास घुशींवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. पेपरमिंट : घुशींना पेपरमिंटचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे कापसावर थोडे पेपरमिंट म्हणजेच अस्मंतारा घेऊन घुस किंवा उंदीर येणाऱ्या रस्त्यात ठेवा. यामुळे हे उपद्रवी प्राणी येणार नाहीत आणि ते पळ काढतील. फिनाईल गोळ्या : या गोळ्या कपड्यामध्ये गुंडाळून घुशींच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यात ठेवल्यास घुशींचा त्रास कमी होतो. तसेच कांद्याचा तीक्ष्ण वास घुशी सहन करू शकत नाही. म्हणून घुशी फिरत असेल त्या ठिकाणी कांद्...

ठिबक सिंचन: शेतात ठिबक सिंचन करायचे आहे तर या गोष्टींची काळजी घ्या होईल फायदा

इमेज
ठिबक सिंचन: शेतात ठिबक सिंचन करायचे आहे तर या गोष्टींची काळजी घ्या होईल फायदा ठिबक सिंचन ही एक आधुनिक व शास्त्रीय पद्धत असून या पद्धतीचे फायदे आता सगळ्यांना माहिती आहेत.विविध पिकांच्या बाबतीत ठिबक सिंचनाचा वापर यांमध्ये महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो. तरी या पद्धतीला काही मर्यादा देखील आहेत. काही कारणामुळे ठिबक संच बंद देखील पडू शकतात किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत व्यतेयनिर्माण होऊ शकतो. आपल्याला वाटते की ठिबक सिंचन जास्तीत जास्त काळ टिकायला हवा. त्यासाठी आपल्याला काही प्रकारे काळजी घेणे महत्वाचे असते. या लेखात आपण ठिबक सिंचनाची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती घेणार आहोत.   ठिबक सिंचन वापरतांना घ्यावयाची काळजी •शेतामध्ये ठिबकसंच बसण्यापूर्वी माती व पाणी याबाबत शास्त्रीयदृष्ट्या पृथक्करण करून घ्यायला हवे. पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण तीन ते चार पीपीएम एवढे असते ते पाणी ठिबक सिंचन करता वापरणे घातक असते. कारण त्यामुळे ठिबकचे ड्रीपर बंद पडू शकतात.असे बंद पडलेले ड्रीपर पुन्हा सुरू करणे अतिशय जिकिरीचे होऊन बसते. •मुख्य पंपसेट, दाबमापक यंत्रे, खत देण्यासाठीच्या यंत्रणा, ...

सातबारा म्हणजे काय असते भाऊ ?

इमेज
सातबारा म्हणजे काय असते भाऊ ? सातबारा हा प्रत्येक शेतकरी बांधवाचा सर्वात ओळखीचा सरकारी कागद. मात्र आजही सातबारा विषयी काही बाबी शेतकरी बांधवांना माहीत नाही. चला तर आज जाणून घेऊ, सातबारा म्हणजे काय असते. 7/12 सातबारा उतारा म्हणजे काय असते ? °यावरून आपल्याला जमीनीची मालकी कुणाकडे आहे. हे समजते. °जमिनीवर कर्ज आहे का ? असेल तर किती आहे ? एकूण क्षेत्र, पिक पाहणी म्हणजे जमिनीवर किती क्षेत्रावर कोणते पिक लावले याची प्राथमिक माहिती समजते. °जलसिंचन साधन, कुळाचे हक्क, इतर हक्क, खाते नंबर, लागवड योग्य क्षेत्र इत्यादी सर्व बाबीची माहिती कळते. विशेष माहिती – °दर १० वर्षांनी ७/१२ नोंद नव्याने लिहिली जाते.  पिक पाहणी नोंद दरवर्षी करणे खूप गरजेचे आहे. कारण यामुळे योजना, अनुदान, विमा, शासकीय नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते. कोणतीही फेरफार नोंद झाल्यास लगेच ती ७/१२ वर अपडेट करून घ्यावी. •सातबारा उतारा नेहमी काळजीपुर्वक वाचावा. त्यात काही चूक असल्यास लगेच आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी करावी. °सातबारा आणि आठ अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासन आणि ई महाभुमी प्रकल्पाचा लोगो असणार आहे...

गव्हाची उशिरा पेरणी

इमेज
गव्हाची उशिरा पेरणी बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठीची नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली तरी काही कारणांमुळे पेरणीची वेळ पाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. ऊस तोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते. महाराष्ट्रात असे उशिराचे क्षेत्र जवळपास 30 टक्के एवढे असते. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने एकंदरीतच गहू लागवड क्षेत्रात घट येण्याची शक्यता आहे. बागायत उशिरा पेरणीची शिफारसही 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र काही शेतकरी 15 डिसेंबर नंतरही गव्हाची पेरणी करतात. वास्तविक 15 नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी 2.5 क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते. हवामान : गव्हाच्या पिकाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी 25 अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते. गव्हाचे व...

जैविक कीड नियंत्रण

इमेज
जैविक कीड नियंत्रण स्वत: मानव, त्याने पाळलेले प्राणी, वनस्पती, पिके आणि नानाविध कृषी उत्पादने, बांधकामात, घरात आणि अन्यत्र वापरायचे लाकडी साहित्य, कापड, वह्या-पुस्तके, कागदी साहित्य इत्यादींना उपद्रव करून मानवी अर्थव्यवस्थेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही सजीवाला पीडक म्हणतात. वनस्पतींची पाने, फुले व मुळे कुरतडणाऱ्या, बागांची नासधूस करणाऱ्या, शेतातील पिकांची तसेच साठवून ठेवलेल्या अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या कीटकांचा आणि कीटकांच्या अळ्यांचा सामान्यपणे कीटक पीडक किंवा सुटसुटीतपणे कीड असा उल्लेख केला जातो. जैविक कीड नियंत्रण: काही प्रकार किडींना नष्ट करण्यासाठी विषारी रसायनांचा वापर केला जातो. परंतु अशी विषारी रसायने अतिप्रमाणात वापरल्यामुळे पर्यावरणातील हवा, पाणी, मृदा आणि अन्न या घटकांचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन मनुष्याचे मोठे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कीड नियंत्रणाच्या विविध जैविक पद्धतींचा विकास झाला आहे. किडींवर पोसणाऱ्या अथवा अन्य नैसर्गिक शत्रूंचा वापर : (१) भाजीपाल्यांवर आणि पिकांवर पडणारा मावा म्हणजे मृदु त्वचेचा एक कीटक आहे. त्याचे प्रजनन अनिषेकजनन (पहा: अ...

संजीवके देतात फळबागांना नवसंजीवनी, जाणून घेऊ संजीवकांच्या वापराचे महत्त्व

इमेज
संजीवके देतात फळबागांना नवसंजीवनी, जाणून घेऊ संजीवकांच्या वापराचे महत्त्व ∆सजीव वनस्पतीमध्ये जी रासायनिक द्रव्य अल्पप्रमाणात कार्यरत होऊन त्या वनस्पतीच्या अंतर्गत कार्यपद्धतीत बदल घडवून आणतात, त्यांना वनस्पती संजीवके असे म्हणतात .  ∆सजीव वनस्पतीमध्ये अथवा शेतातील पिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या संजीवकांचा पीक संजीवक असे म्हणतात . या लेखात आपण संजीवकांचे प्रकार व महत्त्व जाणून घेऊ. संजीवकांचे प्रकार  संजीवकांचे वाढ प्रेरक आणि वाढ निरोधक असे मुख्य दोन प्रकार आहेत. संजीवकांचा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये भाग घेण्याच्या प्रवृत्तीला अनुसरून संजीवकांची निरनिराळ्या गटामध्ये वर्गवारी केली जाते. ऑक्सिन - ज्या रासायनिक द्रव्यांमध्ये वनस्पतीच्या पेशी लांबट करण्याची क्षमता असते अशा द्रव्यांना ऑक्सिनम्हणतात.फळ झाडात वाढ नियंत्रित करण्यासाठी, फुल व फळांची गळ थांबवण्यासाठी नवीन मूळ येणे,सुप्तावस्था मोडणे, बहर नियंत्रित करणे व इतर कारणासाठी संजीवकांचा उपयोग होतो. हा संजीवकांचा महत्त्वाचा गट आहे. यासाठी बाजारात प्लानोफिक्स,सिरडीक्स, इत्यादी ओलर उपलब्ध आहेत. या गटामध्ये इंडोल ऍसिटिक ऍसिड,बु...

बीट लागवड

इमेज
बीट लागवड विषयी. सॅलेड, सरबत, कोशिंबीर, चटणी, रक्त वाढीसाठी याची चांगले मदत होते. भारतात पंजाब, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. बाजारात याची चांगले मागणी आहे. जमिनीचा प्रकार बिटच्या लागवडीसाठी भुसभुशीत, पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. तसेच भारी जमिनीत बीटाची लागवड केल्यास बीटाच्या मुळाचा आकार वाकडा होतो. या साठी जमिनीचा सामू हा ६ ते ७.५ असावा. तसेच ९ते १० सामू असणाऱ्या क्षारयुक्त जमिनीत बीटाची वाढ चांगले होते तसेच बीट ची महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवड केली जाते. हवामान बिट हें थंड हवामानातील पीक असून या काळातील हवामान पोषक असते बीटची रब्बी हंगामात ऑक्टोबर मध्ये बी पेरणी केली जाते परंतु महाराष्टामध्ये जून व जुलै मध्ये बियांची पेरणी केली जाते. पिकाची जात डेट्राईट डार्क रेड, क्रीम्सन ग्लोब, अर्ली वंडर लागवड एक हेक्टर साठी ७ ते १० किलो बियाणे लागते.बियाणां ची लागवड पेरून किंवा टोकण पद्धतीने करावी. एका ठिकाणी २ बिया टोकून लागवड करावी बीटासाठी ४५ सेमी अंतरावर सरीवर करावी आणि सरी वरंबा १५ ते २० से मीटर अंतरा...

रानडुकरामुळे हैराण असाल तर अशा पद्धतीने करा पिकांचे संरक्षण

इमेज
रानडुकरामुळे हैराण असाल तर अशा पद्धतीने करा पिकांचे संरक्षण वन्य प्राण्यांपासून बऱ्याचदा शेतात असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत असते. कारण वन्य प्राण्यांचा उपद्रव हा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी अनेक प्रकारचे देशी तंत्रज्ञान पद्धतीचा वापर केला जात आहे. पारंपारिक पद्धतीने आपण वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण निश्चितच करू शकतो. परंतु या पद्धतींचा अवलंब करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी हेतितकेच महत्वाचे असते.रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या काही परंपरागत पद्धती आणि त्या पद्धती वापरताना घ्यायची काळजी याविषयी या लेखात माहिती घेऊ. रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या काही पद्धती मानवी केसांचा वापर- रानडुकरांचा ज्ञानेंद्रियांचा विचार केला तर त्यांची दृष्टी आणि श्रवण हे दोन्हीही कमकुवत असतात. या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने ते अन्नाचा शोध घेत असतात. त्यासाठी स्थानिक केस कापण्याच्या दुकानातून मानवी केस गोळा करून आपण रानडुकरांचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकतो. यामध्ये पिकामध्ये हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरवील्याने अन्नाच्या शोधा...

शेती कर्जाचे प्रकार ।। जाणून घ्या महत्वाची माहिती

इमेज
शेती कर्जाचे प्रकार ।। जाणून घ्या महत्वाची माहिती  शेती कर्ज हा शेती व्यवसायातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत शेती कर्जाचे प्रकार तसेच कर्ज परतफेडीचे हप्ते याविषयीची माहिती. शेती कर्जाचे बरेच प्रकार येतात परंतु त्याच्या वापरावरून किंवा त्याच्या हेतू वरून कर्जाचे प्रकार पडतात. सुरुवातीला दोन प्रकार पाहूया तिसरा प्रकार शेवटी थोडक्यात पाहू. १. Working Capital / पीक कर्ज २. Term Loan / मुदत कर्ज ३. माल तारण कर्ज 1) पीक कर्ज : जे प्रत्येक वर्षी खर्च येतात त्याला पीक कर्ज म्हटले जाते. ज्यामध्ये बी-बियाणे, आंतरमशागती, खते व औषधे किंवा लेबर खर्च असेल यांचा खर्च ज्या कर्जा मध्ये येतो त्याला पिक कर्ज म्हणून ओळखला जाते. जमिनीच्या मशागतीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंतचा जेवढा खर्च येतो तो खर्च या कर्ज मध्ये येतो. याची खासीयत अशी असते की हे पीक कर्ज तुम्ही वर्षातून कितीही वेळा भरू शकता आणि कितीही वेळा काढू शकता. म्हणजे बँकेने तुम्हाला ठराविक मुदत दिलेली असेल त्या मुदतीमध्ये तुम्हाला हे पीक कर्ज भरायचे तर आहेच परंतु त्याच्या आधे मधे तुमच्याकडे काही पैसे आले तर त...

फुलशेती विषयी प्राथमिक माहिती

इमेज
फुलशेती विषयी प्राथमिक माहिती आज शेतकरी बांधव शेतात नवीन नवीन प्रयोग करत आहे. फुलशेती हा असाच एक यशस्वी प्रयोग आहे. मात्र अनेक शेतकरी प्राथमिक माहिती नसताना फुलशेती करतात आणि आर्थिक नुकसानीच्या विळख्यात सापडतात. चला तर पाहुयात फुलशेतीची प्राथमिक माहिती…. ∆फुलशेती करताना खालील मुद्दे खूप महत्वाचे आहे. *योग्य हवामान आणि जमीन *सिंचन सुविधा *शेडनेट किंवा पॉलीहाऊस *योग्य खत व्यवस्थापन *तोडणी, प्रतवारी आणि पॅकिंग *मार्केटिंग  ∆कोणत्या फुल पिकांची लागवड करावी ? *गुलाब *जरबेरा *कार्नेशन *मोगरा *अस्टर *शेवंती *झेंडू *ऑर्किड *स्टाटीस *निशिगंध *जाई आणि जुई *अंथुरियम ∆कोणत्या फुलांना मार्केट मध्ये सतत मागणी असते ? *गुलाब *झेंडू *जरबेरा *ऑर्किड *कार्नेशन ∆कोणत्या हंगामात फुलाची मागणी जास्त असते ? फेब्रुवारी महिन्यात गुलाब फुलांची मागणी भरपूर असते. श्रावण, दिवाळी, दसरा या भारतीय सणाच्या काळात झेंडू, शेवंती, जाई जुई या फुलांना चांगले मार्केट असते. पंचतारांकित हॉटेलात, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड अश्या विदेशी फुलांची १२ महिने मागणी असते. मोगरा, जाई व जुई अश...

जमिनीची सुपिकता"

इमेज
शेतकरी मित्रानो       आपल्या शेतीजमिनीत कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर "जमिनीची सुपिकता" अत्यंत महत्वाची आहे.त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात .     आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे, ती जमीन  सुपीक, अशा जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो,जिवाणूंची संख्या एक मूठभर मातीत 10 कोटी पेक्षा जास्त असते , गांडूळ आणि 70 /80 प्रकारचे जिवाणू असतात. ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे ज्या जमिनीचा EC  0.5 च्या आत आहे ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत, कि ज्यावर आपल्या जमिनीची सुपीकता अवलंबून असते.आपण शेतीतून उत्पन्न घेतो, ज्याकाही पिकांचे आपण उत्पन्न घेतो त्यासाठी  वेगवेगळ्या प्रकारच्या 16 अन्न घटकांची आवश्यकता असते . पिकास आवश्यक असणारे " मूळ अन्न द्रव्ये - घटक " 16 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4 भाग पाडले आहेत .  (1) नैसर्गिक अन्न घटक = 3 ;  ...

पती-पत्नी दोघे घेऊ शकता का पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा; जाणुन घ्या काय आहेत नियम

इमेज
पती-पत्नी दोघे घेऊ शकता का पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा; जाणुन घ्या काय आहेत नियम नमस्कार आपणही शेतकरी आहात का? मग तुम्हीही घेत असाल ना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा? मग हि बातमी तुमच्यासाठी खास आहे. केंद्रातील मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. ह्या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपया प्रमाणे एका वर्षात तीन हफ्ते दिले जातात. म्हणजे 6000 रु वार्षिक दिले जातात. ह्या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात. शेतकरी मित्रांनो ह्या पीएम किसान चे आतापर्यंत 9 हफ्ते शेतकऱ्यांना भेटले आहेत आणि लवकरच दहावा हफ्ता देखील शेतकऱ्यांना भेटणार आहे. आता प्रश्न असा आहे की, शेतकरी पती पत्नी दोघेही ह्या योजनेसाठी अँप्लाय करतात, मग त्या दोघांना ह्या योजनेचा फायदा मिळेल काय? तुम्हाला हि हा प्रश्न पडला असेल हो ना! मग आज आपण ह्या प्रश्नाचे उत्तर जाणुन घेऊया. शेतकरी मित्रांनो जर पती पत्नी ह्या दोघांनी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अँप्लिकेशन दिले असेल, तर ह्या योजनेद्वारे फक्त एकालाच म्हणजे पती ...

खतांची गुणवत्ता ओळखण्याच्या टिप्स!रासायनिक खतांचा वापर करता,तरअशा पद्धतीने ओळखा खतांची गुणवत्ता

इमेज
खतांची गुणवत्ता ओळखण्याच्या टिप्स!रासायनिक खतांचा वापर करता,तरअशा पद्धतीने ओळखा खतांची गुणवत्ता पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अनेकदा रासायनिक खतांचा वापर केला जातो. खरेतर सुपीक जमिनीमध्ये पुन्हापुन्हा पीक उत्पादन घेतल्यामुळे हळूहळू जमिनीची सुपीकता कमी होऊ लागते. म्हणून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण केले पाहिजे.   आता अधिक उत्पादन देणाऱ्या जातींच्या वापरामुळे आणि आरोग्य माती व्यवस्थापनामुळे मातीची प्रजननक्षमता कमी होण्यास सुरूवात झाली आहे.  पिकास कोणत्या प्रकारचे खते आवश्यक आहेत. त्यांचे गुणधर्म काय आहेत आणि त्याची उत्पादनक्षमता कशी वाढवायची या विषयी संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया, स्फूरदचापुरवठा करण्यासाठी डीएपी, एस एस पी किंवा एन पी केआणि पालाशचा पुरवठा करण्यासाठी एम ओ पी किंवा एनपीकेचा वापर केला जातो.तसेच जस्त चा पुरवठा करण्यासाठी झिंक सल्फेटचा वापर केला जातो . आता आपण खतांची गुणवत्ता कशी तपासली जाते हे पाहू.  अशा पद्धतीने खतांचे गुणवत्ता तपासावी य...

शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? म्हणजे भरपूर फायदा होईल.

इमेज
शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? म्हणजे भरपूर फायदा होईल. दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात.  महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात.  १७ मार्च ते १९ मे किंवा हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग किंवा आर्द्रा कोरडे जाते, तेव्हा ७ जूनपर्यंत दर आठ दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर ५ ते १० गुंठ्याचे कोथिंबीरीचे प्लॉट करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात.  जून-जुलैमध्ये झेंडूचे बी टाकून रोप तयार करावे. म्हणजे हमखास झेंडूचे दसरा-दिवाळीत पैसे होतात. ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडीस वर्षभर जैविक औषधे सेंद्रिय खत वापरून आले ले 'न लागलेले आले' गणपतीपासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात.  सप्टेंबरमध्ये हस्त बहार धरून लिंबाला भाव मिळून पैसे होतात.  द्राक्षाची एप्रिल, ऑक्ट...

शेतकरी मित्रांनो; किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरा कामगंध साफळा, कसा वापरायचा? पहाच

इमेज
शेतकरी मित्रांनो; किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरा कामगंध साफळा, कसा वापरायचा? पहाच शेतकरी (farmer) आळीचा बंदोबस्त करायचा असेल तर कामगंध साफळ्याची उभारणी करतात. कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे आणि कामगंध सापळ्याची काय भुमिका आहे? याबाबद आपण सविस्तर माहिती घेऊया… सर्वसाधारणपणे मादी पतंगाच्या कामगंधा द्वारे नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे व्यवस्थापन मिळण्यासाठी फेरोमन (Pheromone) चा मोठ्या प्रमाणात वापर वाढत आहे. सर्वसाधारणपणे पीक संरक्षण उपाय सुरू करण्यापूर्वी सापळ्यात कमीत कमी किती पतंग अडकले आहेत याची खात्री करा. सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा (Spodoptera) या किडीचे सरासरी 8 ते 10 नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळून आल्यास या किडीच्या व्यवस्थापनासाठीचे उपाय करणे आवश्यक आहे. कापसातील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन – कापूस (cotton) पिकातील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन मिळविण्यासाठी प्रती एकर आठ ते दहा कामगंध सापळे गुलाबी बोंड अळीच्या गोळी सह लावा. कीटकाच्या मिलनात अडथळा निर्माण करण्यासाठी सापळ्य...

कपाशीच्या टाकाऊ पराट्या पासून बनू शकतात मूल्यवर्धित उत्पादने

इमेज
कपाशीच्या टाकाऊ पराट्या पासून बनू शकतात मूल्यवर्धित उत्पादने कपाशी हे भारतातील महत्त्वपूर्ण नगदी पीक आहे.कापसाचा उपयोग प्रामुख्याने कापडनिर्मिती उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.कापूस सोडला तर कापसापासून शिल्लक राहणारे सरकी आणि पऱ्हाट्या या टाकाऊ असल्याचे समजले जाते.जर प्रति वर्ष विचार केला तर सुमारे 30 दशलक्ष टन कापसाच्या पऱ्हाट्या मिळतात जास्त करून या परट्याचा उपयोग हा घरगुती जळणासाठी केला जातो. आणि उरलेल्या जाळल्या जातात. परंतु मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेने कपाशीच्या काढणीपश्‍चात उरलेला अवशेषांपासून या मूल्यवर्धित उत्पादन निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. या लेखात आपण कपाशीच्या उरलेल्या अवशेषांपासून कोणते मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात हे पाहू.   कपाशीच्या अवशेषांपासून तयार करता येणारे मूल्यवर्धित उत्पादने कंपोस्ट खत - कपाशीच्या पराट्यान वर जैविक घटक आणि एनपीके ची मात्रा देऊन कुजवण्याची सुधारित व जलद प्रक्रिया विकसित करण्यात आले आहे. जर आपण पारंपरिक पद्धतीने कपाशीच्या पराठ्या कूजवण्याचे ठरवले तर त्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा का...

नत्र / युरिया केव्हा द्यावे

इमेज
* _नत्र / युरिया केव्हा द्यावे_ * _◆नत्र युक्त खते हि पिकाच्या वाढीच्या काळात द्यावीत, पिक लागवडी पुर्वी देवु नयेत._ _◆नत्र युक्त खते वापरण्यापुर्वी जमिनीत सेंद्रिय पदार्थ जी पुर्णपणे कुजलेली असतिल केवळ तीच, योग्य प्रमाणात असावीत._ _◆ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, मात्र जमिन भारी आहे, अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेट कशाचा ही वापर हा फायदेशिर ठरतो._ _◆मात्र ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, तसेच जमिन हलकी आहे अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेटचा वापर हा जास्तीत जास्त वेळेस विभागुन असा करवा. हि खते सेंद्रिय पदार्थांसोबत एकत्र करुनच द्यावीत._ _◆ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, अशा जमिनीत अमोनियम सल्फेटचा वापर हा सामु कमी करणे आणि व्होलाटायझेशन कमी करणे यासाठी देखिल फायदेशिर ठरतो कारण अमोनिमय सल्फेट हे कोणत्याही परिस्थितीत 10 ते 14 टक्के ईतकेच व्होलाटायझेशन होते तर युरिया चे व्होलाटायझेशन हे 20 ते 30 टक्के इतके असते._ _◆जर ह्युमिक अँसिडचा वापर होणार असेल तर त्यात युरिया विरघळवुन त्याचा वापर करावा. कारण ह्युमिक अँसिडची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही फार जास्त असते ज्यामुळे व्होलाटा...