पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इथे २ दिवसात खराब होणारं दूध, विदेशात मात्र आठवडाभर टिकतं - असं का?

इमेज
इथे २ दिवसात खराब होणारं दूध, विदेशात मात्र आठवडाभर टिकतं - असं का?  आपल्याकडे दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुधाशिवाय जशी चहाची कल्पना आपण करू शकत नाही, अगदी तसंच दुधाशिवाय देवाच्या प्रसादाची कल्पना देखील करवत नाही. अगदी जाहिरातींमधून सुद्धा दुधाचं महत्व प्रत्येक वेळेला दर्शवलं जातं! बॉर्न व्हिटा सारख्या कंपन्या सुद्धा त्यांचं प्रोडक्ट विकलं जावं म्हणून त्यांच्या जाहिरातींमध्ये दुधाचे फायदे लोकांना सांगतात! लहान मुलांना नुसतं दूध आवडत नाही, मग ते पोटात जावं यासाठी अशा कित्येक युक्त्या आणि जाहिराती केल्या जातात! आपल्याइथे तर दूध एक रस्त्यावरच्या भिकाऱ्यापासून अंबानी पर्यंत सगळ्यांनाच लागत! तबेल्यातल्या दुधापासून थेट बंद टेट्रा पॅक मध्ये येणाऱ्या दुधाचा खप आपल्याला माहित आहेच, शिवाय लोक श्रद्धेच्या पोटी शंकराच्या पिंडीवर जे दूध वाहतात त्याची तर गणनाच होऊ शकत नाही, असो तो ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय असतो! पाहायला गेलं तर प्रत्येक महत्त्वाच्या खाद्यपदार्थामध्ये दुध अतिशय महत्वाची भूमिका बजावतं आणि आपल्या जिभेची चव शांत करतं. महाराष्ट्रात तर कित्येक दुधाचा धं...

शेतात अंडा संजिवक वापरा आणि बघा अप्रतिम बदल.

इमेज
शेतात अंडा संजिवक वापरा आणि बघा अप्रतिम बदल. अर्थातच शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे हाच त्याचा मोठा उद्देश व जमीन टिकवणे हाही एक उद्देश असावा त्या अनुषंगाने शेतात अंडा संजीवक वापरल्याने अप्रतिम बदल दिसून येतात व पिकांना आणि मातीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. दूध हे पूर्ण अन्न आहे , अंड्यात लागणारे व्हिटॅमिन व प्रोटीन असतात तर गुळामध्ये पिकास आवश्यक असणारे मिनरल्स असतात . मी गेल्या 1 वर्षांपासून तसेच मित्रांच्या देखील डाळीम्ब , हळद , द्राक्ष , आंबा या बागावर यांचे प्रयोग केले. याचे उत्तम परिणाम पहायला मिळतात.  याला दोन प्रकारे वापरता येते  फवारणी 1 ली गायीचे किंवा म्हशीचे न तापवलेले दूध , 4 अंडी गावरान किंवा बॉयलर , 400 ग्राम गुळ हे सर्व एकत्र तयार करून फवारणीच्या 1 ली पाण्यात 5 मिली द्रावण टाकणे , म्हणजेच 15 ली चा पम्प असेल तर 75 मिली आणि तापमान कमी असताना फवारणी करणे.  मला आढळून आलेला फरक  झाडांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते ,निर्देशांक पान वाढतो , सूक्ष्म अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात मिळून पीक अतिशय निरोगी राहते  जमिनीतून पाण्यावाटे 5 ली दूध , 12 ...

थंडीमध्ये पिकांची घ्यावयाची काळजी

इमेज
*_🌱थंडीमध्ये पिकांची घ्यावयाची काळजी 🌿_* *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *_✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮✮_* _सध्या सर्वच विभागांमध्ये थंडीचा कहर पहायला मिळत आहे सरासरी ५℃ ते १५℃ तापमानाची नोंद दिसून येते. अशा कमी तापमानाचा पिकांवरती अनिष्ट परिणाम पहायला मिळतो थंडीचे पिकांवरती होणारे दुष्परिणाम व करावयाचे उपाय यांवर आपण थोडी माहिती घेणार आहोत._ *_🎯दुष्परिणाम_* _*१.* अति थंडीमुळे पानांचा आकार कमी होणे, पानांचा रंग निळसर होणे, झाड कोमजल्यासारखे दिसणे._ _*२.* झाडांची श्वासोच्छ्वास ( Respiration ) क्रिया मंदावणे._ _*३.* प्रकाशसंस्लेषण ( photosynsthesis ) क्रिया मंदावणे._ _*४.* पेशी गोठणे व त्यामुळे एकंदरीत झाडाच्या सर्वच भौतिक क्रियेत बदल होणे._ *_🎯उपाय_* _*१.* दिवसात अथवा रात्रीत ज्या वेळेला सर्वात कमी तापमानाची नोंद असेल त्या वेळेला प्लॉटला पाणी देणे (जमिनीचे तापमान नियंत्रित होते ) फ्लड पाणी दिल्यास उत्तम._ _*२.* झाडावर पाण्याचा फवारा घेणे ( स्प्रिंकलर देणे जेणेकरून पानांवरती पाणी मारल्यावर प्लॉटमधील आद्रतेमुळे वातावरणातील तापमानापेक्षा किमान २° से.ने प्लॉटमधील तापमान वाढते )_ _*३.* अमिनो...

अननसाची लागवड करा या प्रकारे आणि मिळवा मोठ्या प्रमाणात नफा

इमेज
अननसाची लागवड करा या प्रकारे आणि मिळवा मोठ्या प्रमाणात नफा सध्या शेतकरी आपल्या शेतामध्ये पारंपरिक पीक न घेता आधुनिक शेतीकडे ओळले आहेत. बाजारात जास्त मागणी कोणत्या गोष्टीला आहे ते लक्षात घेऊन शेतात उत्पादन घेत आहेत. शेतकरी शेतात फळे तसेच भाजीपाला चे चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ लागले आहेत. फळबागा म्हणले तर त्यामध्ये अननसाची लागवड करणे शेतकरी पसंद करत आहेत जे की यामधून चांगल्या प्रकारे नफा सुद्धा भेटत आहे. अननसाची पूर्ण बारा महिने लागवड करता येते तसेच बाजारात सुद्धा बारा महिनेही अननसाला मागणी असते. अननस वनस्पती कशी आहे... अननसाला वैज्ञानिक नाव कोमोसस असे आहे. खाण्यायोग्य ही वनस्पती आहे. निवडुंग जातीची ही वनस्पती आहे ज्यास इंग्रजी मध्ये pine Apple असे म्हणतात. अननस हे फळ मूळचे पॅराग्वे आणि दक्षिण ब्राझीलचे आहे. अननस हे आपण कापून तसेच ज्यूस करूनही पिऊ शकतो. अननसमध्ये पोषक तत्वे आढळतात... अननसात अम्लीय गुण जास्त असतात जसे की त्यामध्ये मॅग्नेशियम चे प्रमाण आढळते. अननसाच्या एका कपमध्ये १६५ ग्रॅम कॅलरीज, फॅट १.७ ग्रॅम, प्रथिने १ ग्रॅम, फायबर २.३ ग्रॅम, कार्बोहायड्रेट २१.६ ग्रॅम, जी...

5 ग्रॅम माती घ्या अन् दोन मिनिटांमध्ये स्वत:च माती परीक्षण करा ! वाचा सविस्तर

इमेज
5 ग्रॅम माती घ्या अन् दोन मिनिटांमध्ये स्वत:च माती परीक्षण करा ! वाचा सविस्तर उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतजमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी(Soil Test) माती परीक्षण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. माती परीक्षण प्रयोगशाळेत चाचणीसाठी 1 किलोघेऊन जाणे आणि नंतर काही दिवसांतत्याचा अहवाल देणे अशी संपूर्ण प्रक्रिया होती. परंतु कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने(IIT) माती परीक्षण जलद आणि अधिक अचूक करण्यासाठी पोर्टेबल किट विकसित केले आहे. मोबाईलच्या मदतीने पाच ग्रॅम मातीचा नमुना घेऊन अवघ्या90 सेकंदात मातीचे आरोग्यजाणून घेता येणारआहे. वेळीची बचत अन् अचूक परीक्षण काळानुसार सर्वसामान्य शेतकरीही माती परीक्षणावर भर देत आहेत. सुमारे 1 किलो मातीचा नमुना माती परीक्षणासाठीप्रयोगशाळेत न्यावा लागतो. अपेक्षित घटकांवर अवलंबून,निष्कर्ष येण्यास दोन ते सात दिवस लागू शकतात. यात शेतकऱ्यांची वाहतूक, वेळ आणि पैसा खर्च होतो. या समस्येमुळे बहुतांश शेतकरी माती परीक्षकरण्यापासून वंचित आहेत.शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटी कानपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअरिंगमधील जयंत कुमार सिंग, पल्...

जवाहर मॉडेल : शेतात पिके न घेता पोत्यात घ्या, कमी खर्चात मिळेल जास्त उत्पादन

इमेज
जवाहर मॉडेल : शेतात पिके न घेता पोत्यात घ्या, कमी खर्चात मिळेल जास्त उत्पादन  महिला शेतकरी ज्योती पटेल या गेल्या अनेक वर्षांपासून बारी येथील एका गटाच्या मदतीने भाजीपाला व इतर पिके घेत आहेत, मात्र यावेळी त्यांना कमी जमिनीत अधिक उत्पादन मिळणार आहे, कारण यावेळी त्यांनी नवीन पद्धतीने तूर पिकाची लागवड केली आहे. ज्योती पटेल या मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील पानगर येथील रहिवासी आहेत, ज्योती पटेल आणि त्यांच्या गटातील अनेक महिलांनी शेतीसाठी ‘जवाहर मॉडेल’ वापरला आहे, ज्यामध्ये पिके जमिनीत न लावता गोण्यांमध्ये लावली जातात. जवाहर मॉडेल जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ, जबलपूर, मध्य प्रदेशच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. ज्योती पटेल यांनी गोण्यांमध्ये तूर पिकाची लागवड केली आहे, ज्योती यांनी मराठी पेपरशी बोलतांना सांगितले की, “आम्ही गटाच्या मदतीने कृषी विद्यालयात गेलो, तिथे ही माहिती मिळाली. ट्रॅक्टरने नांगरणी करता येईल एवढी जमीन आमच्याकडे नाही, त्यामुळे आम्हालाहे मॉडेल योग्य वाटले. आपल्या घराभोवती गोण्यांमध्ये पिके कशी लावता येतील याची संपूर्ण माहिती देण्यात आली. मी...

कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष.

इमेज
कडूनिंब : पृथ्वीतलावरील सुवर्ण वृक्ष. शेतकरी बंधुंनो कडुनिंबाचा प्रत्येक भाग हा बहुगुणी व बहुपयोगी असून त्याचे व्यापारी तत्त्वावर सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण या पहिल्या भागात कडूनिंबा मधील विविध भागाचे उपयोग व महत्त्व तसेच सारांश रुपात कडुनिंबाच एक झाड मानवाला त्याच्या आयुष्यात सरासरी काय देणगी देऊन जातं या बाबी विषयी थोडे जाणून घेऊ या.  (A) कडुनिंबाच्या विविध भागाचे उपयोग व महत्व (१) कडुनिंबाची पाने : कडू निंबाच्या पानात अनेक औषधी गुणधर्म आहेत. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कडुनिंबाच्या पानाचा रस पितात किंवा पाने खातात. गजकर्ण, सूज ,हिवताप ,आतड्यातील बुरशी, इत्यादी व्याधीवर कडुनिंबाचा काढा प्रभावशाली असल्याचे आढळून आले आहे.जखमा लवकर भरून येण्यासाठी कडुनिंबाची पाने ठेचुन जखमेवर बांधतात. कडुनिंबाची पाने कडू व शीतकारक असतात. कडुनिंबाच्या पानांची पावडर तयार करून दंतमंजन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जातो.घरगुती धान्य दीर्घकाळ टिकण्यासाठी कडूनिंबाच्या पानाचा कीड प्रतिरोधक म्हणून उपयोग केला जातो. नैसर्गिक रित्या कडुनिंबाच्या पानगळी मुळे जमिनीत सेंद्रिय पद...

माईकोरायझा बद्दल काही माहीती

इमेज
माईकोरायझा बद्दल काही माहीती  अंदाजे 80% ज्ञात वनस्पतींच्या प्रजाती, ज्यामध्ये सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या नगदी पिके सोयाबीन, कापुस,ऊस,केळी,पपई हळद,वैगरे आहेत, त्यांच्याशी सुसंगत सहजीवन पद्धतीने जगते. झाडे आणि माती मधे माईकोरायझा हे परस्पर फायदेशीर भागीदार आहेत. परंतु दुर्दैवाने, हे फायदेशीर माईकोरायझा बुरशी मानवनिर्मित लँडस्केपच्या विकासात नष्ट होत चालली आहे, ज्यामुळे या वातावरणातील वनस्पतींना अतीशय संघर्ष करावा लागत आहे. माईकोरायझा बुरशी मूळ प्रणालीची वसाहत करते, तंतूंचा एक विशाल नेटवर्क तयार करते. हे बुरशीजन्य पध्दत आर्द्रता टिकवून ठेवते आणि नैसर्गिक मूलद्रव्य शोषण करण्यासाठी नैसर्गिकरित्या खनिज व पोषक द्रव्ये आणी अनलॉक करणारी शक्तिशाली एन्झाईम प्रणाली तयार करते. वनस्पतीच्या मुळाशी जोडण्याच्या त्यांच्या अविश्वसनीय क्षमतेमुळे माईकोरायझा सूक्ष्मबुरशी मुळांच्या विस्तार झपाट्याने करते व आसपासच्या जमिनीच्या मोठ्या प्रमाणातील पाणी आणि पोषक द्रव्ये षोशन करुन त्यास वनस्पतींच्या मुळात आणते,वनस्पतींची पोषण आणि वाढ सुधारते.  माईकोरायझा बुरशीजन्य तंतूचे नेटवर्क तयार करुन हे...

ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण प्रणाली

इमेज
ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण प्रणाली ट्रायकोडर्मा टिकण्याची क्षमता किंवा वैधता ही फक्त ६ महिने इतकीच असते. ही क्षमता वाढवण्याच्या मायक्रोबियल इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानाने ट्रायकोडर्माच्या गोळ्या (बायोकॅप्सूल) तयार करण्यात आल्या आहेत. निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही रोगकारक, तर काही पिकांचे रोगापासून संरक्षण करणाऱ्या असतात. ट्रायकोडर्मा ही एक अशीच उपयुक्त बुरशी आहे. मातीमध्ये वाढणारी ट्रायकोडर्मा ही बुरशी सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी परोपजीवी व अन्य रोगकारक बुरशीवर उपजीविका करते. पिकांच्या जैविक रोगनियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ॲस्परलम आणि ट्रायकोडर्मा हरझानियम या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. सुमारे ८७ वेगवेगळ्या पिकांवर आणि मातीमधील ७० रोगकारक बुरशी आणि झाडावरील १८ बुरशींच्या नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्माचा वापर केला जातो. त्यातही ट्रायकोडर्मा ॲस्परलम ही प्रजाती खूप प्रचलित आहे. भारतामध्ये ट्रायकोडर्मा हा १८५० टन प्रति वर्ष वेगवेगळ्या प्रकारे तयार केला जातो. पिकातील वापर ः कापूस, तेलबिया, कडधान्ये, भाजीपाला अशा विविध पिका...

जैविक खतांचा वापर का करावा?

इमेज
जैविक खतांचा वापर का करावा? अशा जमिनीत वनस्पतींच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. नियमित रासायनिक खतांच्या वापराने जमिनीतील पाण्यावर विपरीत परिणाम होऊन पाणी ते दूषित होते.             शेतीमधील प्रभावी सूक्ष्मजीव मातीचे टिकाऊ पुनरुत्पादन करण्यास मदत करतात, यामुळे सुपीकता वाढते आणि जमिनीतील जीव सक्रिय होतात. सुक्ष्म जिव हे जमीनीच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पुर्वी निसर्गा मधे मानवी हस्तक्षेप कमी होता, पण आता तो खूप वाढल्यामुळे या डोळ्यांनी न दिसणा-या जिवांचा विचार करणे आवश्यक आहे.वनस्पतींसाठी काम करणाऱ्या या जीवाणूंची प्रक्रिया ही पूर्वीपासून चालत आलेली आहे पण आता वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे वाढत चाललेल्या जमिनीच्या प्रदूषणामुळे त्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. वनस्पतीं साठी लागणारे वातावरणातील घटक त्यांना मिळवून देण्यासाठी या सूक्ष्मजीवांचा किंवा जैविक खतांचा खूप मोठा वाटा आहे. वेगवेगळ्या पकारची सूक्ष्मजीव हे ही पिकांसाठी खूप महत्त्वाची आहेत त्यांच्या पानांच्या मुळांच्या आणि खोडाच्या वाढीसाठी परिपूर्ण अन्न मिळवून देण्यासाठी खूप मह...

शेणखत न कुजलेले असेल तरीही फायदेशीर ठरते का ?

इमेज
शेणखत न कुजलेले असेल तरीही फायदेशीर ठरते का ? जमीन भुसभुशीत राहावी आणि जमिनीची योग्य प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढावी. हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा शेणखत पूर्णपणे कुजलेले असते.  शेणखत न कुजलेले असेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात.  १) जेव्हा आपण असे शेणखत मुळांभोवती टाकतो तेव्हा त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरूच असते. ह्या कुजण्याच्या प्रक्रियेत शेणखताचे तापमान 65ते75 डिग्री सेल्सिअस च्या आसपास जाते. त्यामुळे झाडाच्या मुळांना शॉक बसतो अथवा इजा होण्याची शक्यता असते. परिणामी झाडाच्या उत्पादकतेत घट होते. कुठलीही गोष्ट कुजण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. असे शेणखत कुजताना जमिनीतील ऑक्सिजन घेत असते आणि झाडांच्या मुळांनादेखील ऑक्सिजन आवश्यक असतोच. परिणामी हे कुजणारे शेणखत जमिनीतील ऑक्सिजनचा साठा कमी करते आणि झाडाच्या मुळांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे झाडाच्या आत काही चुकीची संप्रेरके स्रवतात आणि हे झाडाच्या उत्पादनक्षमतेला मारक ठरते.जर ह्या कुजणाऱ्या शेणखताला ऑक्सिजन मिळाला नाही तर ते सडण्याची प्रक्रिया सुरू होते. ह्या सडणाऱ्या शेणखतात उपद्रवी बुरशी वाढण्याचा...

एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या उत्पादनासाठी दुहेरी जोड कलम पद्धती

इमेज
एकाच झाडावर वांगी, टोमॅटोच्या उत्पादनासाठी दुहेरी जोड कलम पद्धती वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये एकाच खुंटरोपावर वांगी आणि टोमॅटोचे दुहेरी जोड कलम करून दोन्ही फळभाज्यांचे एकाच वेळी उत्पादन घेण्याचा प्रयोग करण्यात आला. या झाडास ‘ब्रिमॅटो’ असे नाव देण्यात आले आहे. वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेमध्ये एकाच खुंटरोपावर वांगी आणि टोमॅटोचे दुहेरी जोड कलम करून दोन्ही फळभाज्यांचे एकाच वेळी उत्पादन घेण्याचा प्रयोग करण्यात आला. या झाडास ‘ब्रिमॅटो’ असे नाव देण्यात आले आहे. याआधी याच पद्धतीने कलम करून एकाच झाडापासून बटाटा आणि टोमॅटोचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. त्यास ‘पोमॅटो’ असे नाव दिले होते. अधिक उत्पादनाव्यतिरिक्त भाज्यांमध्ये जैविक आणि अजैविक ताणासाठी सहनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने दुहेरी जोड कलम ही पद्धत अधिक उपयुक्त ठरू शकते. या पद्धतीमध्ये एकाच कुळातील २ किंवा त्यापेक्षा जास्त कलम काड्यांचा वापर करून एकाच झाडापासून एकापेक्षा जास्त भाज्यांचे उत्पादन घेणे शक्य आहे. कलम बांधणीसाठी वाण निवड ः वां...

ह्युमिक आम्ल शेतीसाठी ठरतंय फायदेशीर, ओसाड जमीन बनतेय सुपीक

इमेज
ह्युमिक आम्ल शेतीसाठी ठरतंय फायदेशीर, ओसाड जमीन बनतेय सुपीक काळाच्या ओघात जसा शेती व्यवसायात बदल होत चालला आहे त्याप्रमाणे नवीन नवीन शोध लागत आहे. आजकाल आपण फक्त उत्पादन वाढीचा विचार करत आहोत पण जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत.हानिकारक रसायने वापरून आपण जमिनीची (soil) पोत कमी करत आहोत आणि याच परिणाम उत्पादनावर होतो.मातीची रचना तसेच खतक्षमता वाढविण्यासाठी ह्युमिक आम्ल महत्वाचे ठरते. ह्युमिक आम्ल कोणताही पिकावर परिणाम करत नाही. ह्युमिक आम्लमुळे रोपांची वाढ तसेच सुधारणा होते. ह्युमिक अँसिड म्हणजे काय? ह्युमिक आम्ल हे एक उपयुक्त खनिज आहे असे कृषितज्ञ डॉ. एस. के. सिंग यांचे मत आहे जे की याचा वापर पडीक जमीन सुपीक करण्यासाठी केला जातो. जमिनीत ओलावा राखण्यासाठी ह्युमिक आम्ल उपयोगाचे आहे.ह्युमिक आम्लमूळे जमिनीमध्ये खत चांगल्या प्रकारे विरघळते तसेच वनस्पती पर्यंत पोहचते. जमिनीमधील नायट्रोजन आणि लोह जोडण्याचे काम ह्युमिक आम्ल करते. ह्यूमिक आम्ल तयार करण्याच्या पद्धती:- डॉ.एस. के.सिंग यांचे असे मत आहे की ह्युमिक आम्ल बनवण्याची पद्धत जर शेतकऱ्यांनी समजली तर उत्पादनात वाढ होई...

किडींच्या प्रादुर्भावापासून नियंत्रणासाठी घरच्या घरी बनवणारे द्रावण म्हणजे "अग्नी अस्त्र"

इमेज
  किडींच्या प्रादुर्भावापासून नियंत्रणासाठी घरच्या घरी बनवणारे द्रावण म्हणजे "अग्नी अस्त्र" पिकांच्या शेंगा व फळे पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावापासून नियंत्रणासाठी घरच्या घरी बनवणारे द्रावण अग्नी अस्त्र… मित्रानो निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यानंतर महत्वाचे म्हणजे अग्नी अस्त्र त्याबद्दल आज आपण समजून घेऊ त्यामध्ये तो कसा बनवायचा कशा पद्धतीने वापरायचा हे आपण पाहणार आहोत.. शेती आधुनिकतेकडे जाताना रासायनिक घटकांचा वापर वाढत चालला आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके यांचा वापर करत असताना जनावरांचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतीला सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी होत आहे. परिणामी जमिनीची सुपीकता व जमिनीतील सूक्ष्म जीवांची जिवाणूंची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. याचा विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे. त्यामूळे आता आपल्याला या रासायनीक शेतीमधून स्वतःला माघे यावे लागेल. घराच्या घरी आपण अनेक कीटकनाशके बनउ शकतो जसे की अग्नी अस्त्र , निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यांची जर आपण फवारणी केली तर नक्कीच आपण शेतीचा खर्च कमी करून जास्त उत्पादन घेऊ शकतो. त्यातीलच एक ...

वाफसा म्हणजे काय ?

इमेज
वाफसा म्हणजे काय ? जमिनीच्या पृष्ठभागाखालि मुळयाच्या परिसरात , दोन माती कणाच्या मध्ये ज्या पोकळया असतात त्या पोकळयामध्ये पाण्याचे अस्तित्व नको तर पोकळयामध्ये 50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे मिश्रण हवे . या स्थितिला ” वाफसा ” म्हणतात . उदा :- 1) गादी वाफ्यात कांदे किंवा लसुण लावतो . वाफ्याच्या काटाचे कांदे मोठे होतात कारण तेथे वाफसा असतो .  2) उंच सखल भाग – त्यात तूर पेरली – सखल भागातील तूर खुरटी व उंच भागातील तूर जोमदार दिसेल कारण वाफसा . जेव्हा आपण सिंचनाचे पाणी देतो आणि पुढे 15 दिवस पाणी ( पाळी ) येणार नाही म्हणुन जास्ती पाणी पाजतो तेव्हा दोन मातीच्या कणामध्ये ज्या पोकळया असतात त्या सर्व पाण्याने भरून जातात व तेथील हवा निघुन जाते. वाफा पाण्याने गच्च भरतो तेव्हा बुड- बुड असा जो आवाज येतो तो त्या निघुन जाणाऱ्या हवेचा असतो . परीणामी मुळया व जीवानुना ऑक्सिजन मिळत नाही आणि जीवाणु मरतात व मुळया कुजतात . मुळाकडुन अन्नाचि होणारी उचल ( Mineral Uptake ) थांबते त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात , वाढ खुंटते अर्थातच उत्पादनात घट . म्हणून पाणी एवढे दिले पाहिजे की , मातीच्या दोन ...

आंतरपीक पद्धतीचे फायदे

इमेज
आंतरपीक पद्धतीचे फायदे १) मुख्य पिकामध्ये कडधान्यवर्गीय पिकाचे आंतरपीक किंवा मिश्र पीक घेतल्यास बहुतेक कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळांवर असलेल्या गाठींद्वारे वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण होते. त्यामुळे जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण वाढून नत्रयुक्त रासायनिक खतांच्या मात्रेत बचत करता येते, तसेच जमिनीची सुपीकता टिकवता येते. २) मुख्य पिकाची आणि आंतरपिकाची मुळे जमिनीच्या वेगवेगळ्या थरांत वाढत असल्यामुळे आणि प्रत्येक पिकाची अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी असल्यामुळे अन्नद्रव्ये, ओलावा इ. साठी तसेच उंची वेगवेगळी असल्यामुळे सूर्यप्रकाशाकरिता स्पर्धा होत नाही. ३) मुख्य पीक आणि आंतरपीक किंवा मिश्र पिकाचा जीवनक्रम पूर्ण करण्याच्या कालावधीत भिन्नता असल्यामुळे कापणी करणे सुलभ होते. ४) आंतरपीक किंवा मिश्र पिकांमुळे शेतकऱ्यांच्या विविध गरजा उदाहरणार्थ नगदी, तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, जनावरांसाठी चारा, जळणाकरिता इंधन इत्यादी गरजा भागविल्या जातात. ५) नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास पूर्ण/सर्व पीक उद्ध्वस्त न होता किमान एका पिकाचे तरी उत्पन्न हाती लागते. ६) कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जलसंधारणाकरिता आ...

कोंबडी खत आहे सेंद्रिय खताचा उत्तम पर्याय, जाणून घेऊ कोंबडी खताचे पिकाला होणारे फायदे

इमेज
कोंबडी खत आहे सेंद्रिय खताचा उत्तम पर्याय, जाणून घेऊ कोंबडी खताचे पिकाला होणारे फायदे सध्या जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचा विचार केला तर त्याचे प्रमाण हे 0.5टक्केच्याखाली चालले आहे.त्यामुळे जमिनी मधील सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.सेंद्रिय खतांनाकोंबडी खत आहे उत्तम पर्याय आहे.कोंबडी खते वापरल्याने मातीची भौतिक,रासायनिक व जैविक क्षमता सुधारते .कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो.कोंबडी खताचा विचार केला तर या खताची प्रत ही कोंबडीची जात,वापरण्यात आलेले लिटर चे साहित्य,कोंबडीचे खाद्य,जागा व पाण्याचा वापर यासारख्या घटकांवर अवलंबून असते.या लेखात आपण कोंबडी खताचे फायदे जाणून घेणार आहोत.   कोंबडी खताचे महत्त्व कोंबडी खतामध्ये तेरा अन्नद्रव्ये असतात.त्यामध्ये नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असतं.कोंबडी खतातील नत्र हे अमोनिया, नायट्रेट,यूरिक ॲसिडया प्रमाणात आढळते. मुख्य अन्नद्रव्य व्यतिरिक्त कॅल्शियम,मॅग्नेशियम, सल्फर,सोडियम,बोरन,झिंक,कॉपर, इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.  कोंबडी खताचे चांगले असण्याचे गुणधर्म 1-खताचा रंग भुरकट,तपकिरी,काळपट असावा.वास मातकट असा...

रब्बी पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी या 11 टिप्सचा अवलंब करा, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल

इमेज
रब्बी पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी या 11 टिप्सचा अवलंब करा, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळेल  1. शेतात खोल नांगरणी करा रब्बी पिकाची पेरणी करण्यापूर्वी शेताची पूर्णपणे नांगरणी करावी. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर इत्यादींच्या साहाय्याने नांगरणीसाठी शेताचा वापर करा. त्यामुळे शेताची तयारी कमी श्रमात आणि वेळेत करता येते. शेताच्या अर्ध्या उतारावर नांगरणी करावी. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत अधिक खोलवर जाण्याचा फायदा होईल. उन्हाळ्यात ही नांगरणी केल्यास जास्त फायदा होतो. 2. वेळेवर पेरणी रब्बी हंगाम आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीशी संबंधित पिकांची पेरणी निश्चित वेळेनुसार करावी. पेरणी योग्य वेळी केली तर उत्पादनही जास्त येते. हे लक्षात घ्यावे की लवकर पिकामध्ये जास्त पीक पेरले जाते आणि उशिरा पेरणी केल्यास कमी उत्पादन मिळते. 3. बियाणे प्रक्रिया / बियाणे टोचणे पेरणीपूर्वी बियाणे लसीकरण करणे फार महत्वाचे आहे. शेतकऱ्यांनी पीक पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करून त्यानंतरच पेरणी करावी. बीजप्रक्रिया किंवा बियाण्यांची लस टोचल्याने पिकावर रोग व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो व निरोगी...

बुरशी आणि बुरशीनाशक विषयी माहिती

इमेज
बुरशी आणि बुरशीनाशक विषयी माहिती बुरशी म्हटलं म्हणजे पिकांची नासाडीचं चित्र आपल्या समोर येत असतं. परंतु काही बुरशी या आपल्या फायद्याच्या असतात. आपल्या मातीत बुरशीच्या अनेक प्रजाती आढळतात, यात दोन प्रकारच्या बुरशी असतात. त्यात एक म्हणजे (शत्रू बुरशी) ही हानिकारक असते तर काही प्रजाती फायद्याच्या (मित्र बुरशी) देखील असतात, जसे की ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा हा सूक्ष्म-कामगार आहे जो रोपांच्या मूळा जवळील भागात (राइजोस्फियर)मध्ये काम करतो. ही बुरशी बहुतेकवेळा सेंद्रिय अवशेषांवर आढळते. म्हणूनच,जमिनीत बुरशीचे माध्यमातून होणाऱ्या अनेक प्रकारच्या पिकाच्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी हे एक महत्त्वपूर्ण बुरशी आहे. हे मातीत वाढते व तेथेच जगते आणि मुळा जवळील भागात राहुन रोपाचे संरक्षण करते. ट्रायकोडर्माच्या जवळपास ६ प्रजाती ज्ञात आहेत. परंतु केवळ दोन ट्रायकोडर्मा विरिडि आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम मातीत मुबलक प्रमाणात आढळतात. हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आणि उपयुक्त आहे. हे एक जैव बुरशीनाशक आहे आणि विविध प्रकारचे बुरशीजन्य रोग टाळण्यास मदत करते. हे रासायनिक बुरशीनाशकांवरील अवलंबून कमी करते. हे...

काळ्या आईसाठी" उपयुक्त "काळ सोनं" म्हणजेच कंपोस्ट खत घरीच बनवा. जाणुन घ्या कंपोस्ट खत बनवण्याची पद्धत

इमेज
काळ्या आईसाठी" उपयुक्त "काळ सोनं" म्हणजेच कंपोस्ट खत घरीच बनवा. जाणुन घ्या कंपोस्ट खत बनवण्याची पद्धत शेतकऱ्यांच्या भाषेत, काळ सोनं म्हणजेच कंपोस्ट खत कचरा व्यवस्थापनाचा एक उत्तम मार्ग आहे, तसेच मातीची गुणवत्ता सुधारण्याचा हा एक उपाय देखील आहे. आपण ते घरी बसून बनवू शकता आणि यासाठी आपल्याला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. अलीकडे शेतकऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे शेतीच्या खर्चात झालेली वाढ ही आहे. यावर कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर काही घरगुती पर्याय आपण शेतीमध्ये केले तर शेतीचा खर्च कमी होऊ शकतो. जसे सेंद्रिय खत शेतकरी त्यांच्या शेतात आणि अगदी सोप्या पद्धतींनी सेंद्रिय खत तयार करू शकतात. यात खर्चही खूप कमी आहे. या खताच्या वापरामुळे शेतांची सुपीकता वाढते. शेतकरी शेतात पेंढा, गवत, पाने इत्यादी जाळतात, ते गोळा करून कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट बनवता येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला यासंबंधित संपूर्ण माहिती देतोय. नेमकं कंपोस्ट खत म्हणजे काय? कंपोस्ट हे कार्बन-नायट्रोजनच्या योग्य प्रमाणात बनवलेले मिश्रण असते. सोप्या भाषेत, अन्न आणि इतर सेंद...

Pashudhan Bima Yojana : जनावरांच्या आकस्मिक मृत्यूवर मिळणार नुकसानभरपाई, जाणून घ्या कशी?

इमेज
Pashudhan Bima Yojana : जनावरांच्या आकस्मिक मृत्यूवर मिळणार नुकसानभरपाई, जाणून घ्या कशी? सध्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटविषयी आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अर्थात शेती व्यवसाय येतो त्याचबरोबर पशुसंवर्धन, पशुपालनाचा व्यवसायही येत असतो. बोलायचे झाले तर त्याची दोन साधने म्हणजे शेती आणि पशुसंवर्धन. बहुतांश शेतकरी गाई-म्हशींचे पालनपोषण करून चांगला नफा कमावत आहेत. परंतु अनेकदा शेतकरी पिकांच्या आणि प्राण्यांच्या असुरक्षिततेबद्दल चिंतेत असतात, जसे की नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाले तर नाहींना किंवा जनावरे कोणत्याही रोग, हवामान किंवा अपघातास बळी पडले नाहीत ना. पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱअयांना नुकसान भरपाई मिळत असते. सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळत असते. शेतकरी पिकांसाठी पीक विम्याचा लाभ नुकसान भरपाई मिळून घेत असतात. मात्र जनावरांचा विमा काढण्यास विसरतात, त्यामुळे शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी पशुधन विमा योजना सुरू केली आहे. (Pashudhan Bima Yojana) याअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. तर मग आम्ही त...

फायदेशीर मेथी लागवड

फायदेशीर मेथी लागवड मेथी ही राज्यातील प्रमुख शेंगा वर्गीय भाजीपाला पिक असून मेथीचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मेथीचे पिक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. काही शेतकरी जवळजवळ वर्षभर मेथीचे पिक घेतात. मेथीमध्ये जीवनसत्व अ, ब, आणि क, कॅल्शिअम, कॅरोटीन, लोह व प्रथिने असल्याने आरोग्यासाठी चांगले असते. मेथी ही पाचक असून यकृताची कार्यक्षमता वाढविते. त्यामुळे पचनक्रिया चांगल्याने होते, तसेच मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथी ला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात जास्त प्रमाणात केला जातो. मेथीच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढील अन्नघटक असतात. पाणी 86 कार्बोहायड्रेटस् 6.0 प्रोटीन्स् 4.4 फॅटस् 0.9 तंतुमय पदार्थ 1.1 खनिजे 1.5 मॅग्नेशियम 0.07 फॉस्फरस 0.005 सोडियम 0.08 कॅल्शियम 0.4 पोटॅशियम 0.05 लोह 0.02 सल्फर 0.02 क्लोरीन 0.02 जीवनसत्व अ 6450 जीवनसत्व क 0.05 उष्मांक (कॅलरीज) 49 हवामान मेथीचे पीक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामा...