पोस्ट्स

एप्रिल महिन्यात करा या पिकांची पेरणी , मिळेल भरपूर नफा.

इमेज
एप्रिल महिन्यात करा या पिकांची पेरणी , मिळेल भरपूर नफा. एप्रिल महिन्यात पेरणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती एप्रिल महिना असा आहे की रब्बी पिकांची काढणी झाली आहे आणि ही पिके मंडईत विकून शेतकरी शेतीपासून मुक्त झाला आहे. यानंतर शेतकरी पुढील जैद पिकांच्या तयारीला लागले आहेत. एप्रिलमध्ये गव्हाची काढणी आणि जूनमध्ये भात/मका पेरणी दरम्यान, शेत सुमारे 50 ते 60 दिवस रिकामे राहते. सध्या, शेतकरी या रिकाम्या शेतात फळबाग, भाजीपाला लागवड आणि अनेक नगदी पिके करून भात/मका पेरण्यापूर्वी 50 ते 60 दिवसांत रोख कमाई करू शकतात. यावेळी, शेतकरी त्यांच्या काही कमकुवत शेतात हिरवळीचे खत तयार करण्यासाठी धैंचा, चवळी किंवा मूग इत्यादी पिके घेऊ शकतात. या प्रकारच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याबरोबरच खताच्या खर्चातूनही सुटका होते. कारण या पिकांपासून उत्पन्न मिळाल्यानंतर शेतकरी जूनमध्ये पेरणी केलेल्या पिकाची लागवड करण्यापूर्वी एक किंवा दोन दिवस किंवा मका पेरणीपूर्वी 10-15 दिवस आधी मातीची नांगरणी करून जमिनीचे आरोग्य सुधारतो. आणि जमिनीची सुपीकता वाढते. या महिन्यात तुमच्या शेतातील मातीची चाचणी करून ...

ऊष्णतेच्या कालावधीत शेतातील पानी व्यवस्थापन करणे गरजेचे

इमेज
ऊष्णतेच्या कालावधीत शेतातील पानी व्यवस्थापन करणे गरजेचे उन्हाळा लागल्याने पाण्याची टंचाई सगळीकडे भासू लागते त्यामुळे त्यामध्ये पाणी याला खूप महत्त्वाचे स्थान आहे उन्हाळा लागल्याने तीव्र उष्णता प्रत्येक प्राण्यांना जाणवणे हे साहजिक च आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुद्धा पाण्याची ची टंचाई भासू लागते. प्रत्येकाला पाण्याची नितांत गरज असते जसे माणसाला पिण्यासाठी, वापरण्यासाठी लागते. तसे च इतर प्राण्यांना सुद्धा पाण्याची नितांत गरज असते ती पिण्यासाठी. त्यामुळे उन्हाळा लागला की आपण पाण्याचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे. जेवढे पाणी लागते तेवढ्याच पाण्याचा वापर केला पाहिजे व आपल्या सोबतच अनेक जीवांना सुद्धा पाण्याची गरज पूर्ण होऊ द्यायला पाहिजे. तर आज आपण जाणून घेणार आहोत कृष्णाच्या कालावधीत शेतीत पाणी व्यवस्थापन गरजेचे आहे. ते कशा प्रकारे करावे शेतकरी बंधूंनो सध्या राज्यात ऊष्णतेची लाट वाढत आहे.पारा 45 अंश सेल्सिअस च्या वर जात आहे.या कालावधीत पिकास ठिबकद्वारे पाणी पुरवठा शक्यतो रात्रीच्या वेळी किंवा ल्याटरल मधील पाणी गरम झालेले नाही हे बघूनच पाणी पुरवठा करावा. भूपृष्ठावर मोठ...

दोन शब्द जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने...

इमेज
दोन शब्द जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने...    आज  ८ मार्च जागतिक महिला दिन तेव्हा या जागतिक महिला दिनाच्या संपूर्ण माता,भगिनी ,बंधू व सर्व देशवासीयांना कृषी महाविद्यालय रिसोड (करडा) व कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम व माझ्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि ग्रामीण भारतातील शेतकरी महिला, ग्रामीण युवती एकदा जागृत व प्रज्वलित झाली की तिच्या प्रगतीबरोबरच राष्ट्राची प्रगती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भगिनी माता आणि बंधुंनो 2001 च्या जनगणनेप्रमाण  ग्रामीण भागातील महिला साक्षरता दर साधारणता 31.6% आहे. कृषी किंवा शेतीमधील विविध विविध कामाचा विचार केल्यास साधारणपणे शेतीमधील जमीन तयार करण्याच्या कामात महिलांचा सहभाग 32%, पेरणी व शेत स्वच्छता मोहिमे मधील महिलांचा सहभाग 80 % टक्के, आंतरमशागतीच्या कामांमधील सहभाग 86% कापणी, मळणी उपननी, धान्य वाळवणे स्वच्छ करणे तसेच धन्याची साठवणूक करणे इत्यादी कामात 84% इतका महिलांचा सर्वसाधारण सहभाग असतो. याचाच अर्थ असा की शेतीच्या विविध कामातील महिलांचा सहभाग जवळजवळ  50 % ते 75 %  आहे. ...

उन्हाळी मूग लागवडीचे तंत्र

इमेज
*_🌱 उन्हाळी मूग लागवडीचे तंत्र 🌱_* * *_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_* *_ᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝ_* _कडधान्य पिकातील अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे अतिमहत्वाचे पीक असून, महाराष्ट्रात त्याचे सुमारे ३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र आहे, विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केला जातो. परिणामी, कमी पाण्यात उत्पादन, जमिनीचा पोत टिकून राहणे, नत्राची पूर्तता करणे अशा बाबी साध्य होतात, या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो, पीक तयार झाल्यानंतर शेंगा तोडून घेऊन ते जमिनीत गाडल्यास हिरवळीच्या पिकांप्रमाणे परिणाम मिळू शकतात._ _*🌱 जमीन :* मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते, चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळांवरील रायझोबिअम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नाही. त्यामुळे रोपे पिवळी पडून उत्पादनात घट येते. साधारणतः ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते._ _*🌱 हवामान :* २१ ते २५ अंश सेल्सिअस तापमान चांगले. मात्र ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानातही हे पीक चांगले येते, खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी ह...

आला उन्हाळा पिकांचे आरोग्य सांभाळा…! उन्हाळी सोयाबीनवर कीड, तर हरभरा काढणीच्या अवस्थेत, वाचा तज्ञांचा सल्ला |

इमेज
आला उन्हाळा पिकांचे आरोग्य सांभाळा…! उन्हाळी सोयाबीनवर कीड, तर हरभरा काढणीच्या अवस्थेत, वाचा तज्ञांचा सल्ला | पीक व्‍यवस्‍थापन हरभरा : वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू : लवकर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उन्हाळी सोयाबीन : उन्हाळी सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करावीत व पिका...

फेब्रुवारी महिन्यात शेती करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, पीक उत्पादन वाढेल

इमेज
फेब्रुवारी महिन्यात शेती करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, पीक उत्पादन वाढेल एकीकडे फेब्रुवारी महिना भाजीपाला पेरणीसाठी चांगला मानला जातो, तर दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात वातावरणातील बदलामुळे अनेक रोग व किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत ICAR-भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना रोग आणि किडींच्या धोक्यापासून पिके वाचवण्यासाठी आवश्यक सल्ला दिला आहे. हवामानातील बदलाचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होऊ शकतो, असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन क्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे पिकांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पिकांवरील रोग आणि कीटकांसाठी सल्ला भारतातल्या उत्तरेकडील भागात येत्या काळात पावसाची शक्यता आहे , त्यामुळे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांची पिके शेतात उभी आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारे फवारणी करू नये, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच सिंचन करू नये. गव्हातील गंज रोगाचा धोका या हंगामात गहू पिकावर पिवळ्या गंज रोगाचा धोका असतो. अशा परिस्थितीत पिकावर विशेष लक्ष ठेवावे, ...

🥜तंत्र उन्हाळी भुईमूग लागवडीचे 🥜

इमेज
*_🥜 तंत्र उन्हाळी भुईमूग लागवडीचे 🥜_* _उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून बियाणे पेरणीसाठी तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. महाराष्ट्रात तेलबियांची पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया म्हणून ओळखले जाते. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामातील भुईमुगाची उत्पादकता जास्त असते. जमिनीत पुरेसा ओलावा भरपूर सूर्यप्रकाश, कोरडे हवामान या बाबी पिकाच्या वाढीस पोषक ठरतात._ *_🎯 जमीन_ * _मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू, सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन लागवडीस योग्य असते. या प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळे हवा कायम खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन आऱ्या सहजतेने जमिनीत जाण्यासाठी आणि शेंगा पोसण्यासाठी मदत होते._ *_🎯 पूर्वमशागत_ * _जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळावे._ *_🎯 लागवडीसाठी सुधारित वाण_ * _*१ ) वाणाचे नाव :* फुले उन्नती_ _*◆प्रकार :* उपटी_ _*◆प...